Monday, July 12, 2010

मित्र.. हक्काचे.. "माझे"...

मला माझे मित्र खूप जवळचे वाटतात!
वाटतात ; कारण ते खरंच जवळचे असतात!

मित्र भेटत गेले.. मैत्री वाढत गेली..
एकमेकांच्या मनामधली अंतरं आपोआपच कमी होत गेली...

शाळा कॉलेज मधल्या मित्रांची मला आठवण येतच नाही...
आठवण येत नाही.. कारण मी त्यांना कधी विसरूच शकत नाही..

आयुष्यात येणारी वादळं काय कमी असतात??
पण या वादळांमध्ये हक्काचा आसरा देणारी या मित्रांचीच मनं असतात!

आसऱ्यासाठी दारावर दस्तक द्यायची पण गरज नसते..
माझ्या मित्रांच्या मनांची दारंच काय..
अहो, खिडकीही माझ्यासाठी कायम उघडी असते...


-omi

3 comments:

  1. सुंदर !असे मित्र प्रत्येकालाच मिळूदेत

    ReplyDelete