Monday, July 5, 2010

भारत बंद चिरायु होवो!

"भारत बंद" यशस्वी झाला.. आता या विरोधकांच्या पार्ट्या होतील.. महाग महाग गाड्यांमधून "पाहुणे" येतील... काही "पाहुण्या" मोक्याच्या जागा घेतील... "उलाढाल" होईल.. पुण्यात "फक्त" ८५ बसेस फोडल्या.. बाकीचं नुकसान काहीच नाही आहे हो!.. त्यांचे पैसे थोडीच बुडलेत?? लोकशाही झिंदाबाद! प्रोटेस्ट केलाच पाहिजे.. नाहीतर लोकशाही तग धरत नाही.. अवेअरनेस पेक्षा प्रोटेस्ट महत्त्वाचा... नाहीतर आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना सोमवारी कसली सुट्टी मिळतीय?? सकाळी जेवण.. नंतर झोप.. किंवा कुटुंबांबरोबर "मुळशी" ला.. किंवा खडकवासल्याला.. मक्याचं कणीस खात! हातात हात घालून फिरायचं.. मज्ज्ज्जा...
भारत बंद छान झाला नाही??

"f**k the opposition"


-omi

1 comment:

  1. एकदम मस्त झाला बंद. जाळपोळ,बस फ़ोडणे वगैरे प्रकार नीट ,सुरळितपणे झाले.कार्यकर्त्यांना अटक वगैरे सगळे एकदम नीट आणि नेहमीप्रमाणे झाले .

    ReplyDelete