Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Saturday, January 21, 2017

एक गाव

एक छान गाव होतं.

एका मोठ्या शहराच्या हद्दीला लागूनच हे आपलं गाव. भरपूर झाडी, नदीकिनारी, शेती वगैरे असलेलं.. त्या गावातली लोकं अत्यंत सुखासमाधानाने राहायची, पंचक्रोशीत कोणाचेही कोणाशी तंटे नाहीत, भांडणं नाहीत..
त्या गावाची माहिती एका प्रधानाला कळली. प्रधान गावाच्या भेटीला आला, सामान्य वेशात, कोणालाही कळणार नाही असा. त्यानं शेतजमीन बघितली, काही नमुने गोळा केले आणि तज्ज्ञांना दाखवायला म्हणून घेऊन गेला.
जाता चहाला थांबला असताना त्याला एका गावकऱ्यानी विचारलं, "कुठुनसा आलास बा?"
"मी? शेजारच्या शहरातून!" प्रधान उत्तरला.
"काय काम काढलं हिकडं गावात?" गावकरी.
"तुमच्या शेतीबद्दल बरंच ऐकलंय, एक दोन चार बिघा जमीन घ्यावी म्हणतो" प्रधान.
"चांगलीच आहे जमीन, पण इकायला कोणी काढलीय?" गावकरी.
"पैसे देईन ना भरपूर!" प्रधान
गावकाऱ्याला काय बोलू कळलंच नाही. पैसे समोर आल्यावर काय करायचं त्या पैशांचं? पोरं सुखानी राहतायत. कुटुंबाला व्यवस्थित खायला मिळतंय. मग कशाला हवेत अजून पैसे, असा त्याचा माफक प्रश्न.
"चला येतो" प्रधान म्हणाला, आणि निघाला.
"हां, या परत!" गावकरी स्वतःच्याच तंद्रीत म्हणाला
"यावंच लागेल" प्रधान मिश्किल हसत हसत निघून गेला
गावकाऱ्याला पडलेला प्रश्न अजून सुटेच ना! पैसे मिळाल्यावर करायचं काय? असो, वेळ आली की बघू, असं म्हणत त्यांनी चहा संपवला आणि आपल्या घराकडे निघाला.
घरी आला, बायकोला किस्सा सांगितला, बायको म्हणाली "तुम्ही ना मुलुखाचे वेंधळे, सांगायचं की, आमची थोडी जमीन घ्या विकत तुम्ही, आणि त्या बदल्यात पैसे घ्या"
गावकरी म्हणाला, "पण त्या पैशांचं करायचं काय?"
बायको म्हणाली, "बँकेत टाकायचे, व्याजावर, खूप मिळतं म्हणे तिकडे शहरात!" "पण आपली गरज आहे तितके पैसे मिळतात आपल्याला, वर उरतात सुद्धा थोडे. जमीन वगैरे मी काही विकणार नाही."
हा विषय त्या घरात तिथेच थांबला, बायको बिचारी चरफडत राहिली.

त्या रात्री त्या गावकाऱ्याला झोप लागली नाही. तोच प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत राहिला, "पैशांचं करायचं काय?"

दिवसामागून दिवस गेले, पावसाळा गेला, मग अचानक राजानी गावात दवंडी पिटवली, राजाचा दरबार भरणार आहे गावात.
"आपल्या गावात राजा येणार? किती छान!" गाव एखाद्या नुकत्याच वयात आलेल्या मुलीसारखं सजलं. गावाला सजवण्यात आपला गावकरी पण आघाडीवर होता!

राजा आला! त्यानी विचारलं, "तुमच्यापैकी किती जण शेजारच्या सुंदर शहरात जाऊन आला आहात?"
काही तुरळक हात वर आले
"बरं, तुमच्यापैकी किती जण तिथे राहून आला आहात?"
कोणाचाच हात वर आला नाही, लोकांना कळतंच नव्हतं की राजाला नक्की काय म्हणायचं आहे.
राजा म्हणाला, "बरं, तुम्ही शहरात गेला नाहीत म्हणून काय झालं, शहर तुमच्याकडे येऊ शकतं ना!" गावकरी अजून बुचकळ्यात.
"आज आम्ही एक निर्णय घेतला आहे, तुमच्या शेतजमिनीपैकी प्रत्येकानी थोडी थोडी जमीन राज्याला दान करायची, दान कशाला, राज्य ती जमीन पैसे देऊन कागदोपत्री व्यवहार करून विकत घेईल, तुम्हाला त्याचे भरपूर पैसे मिळतील"
आपला गावकरी राजा बोलता बोलताच मध्ये उठला, उभा राहिला, आणि त्यानी राजाला सवाल केला, "पण या पैशाचं करायचं काय?" प्रधान लगबगीने त्याच्याकडे आला, "सांगतो", आणि त्याला बाजूला घेऊन गेला.
मग राजानी सगळ्या गावाला, गावकऱ्यांना शहराचे फायदे सांगायला सुरुवात केली.
"भरपूर पाणी, वीज, पक्के रस्ते".. वगैरे वगैरे..
"हे शहर झालं की बाहेरची, विदेशातली लोकं इथे राहायला येतील, त्यांच्यामुळे तुमच्या धंद्याला, मालाला अजून उठाव मिळेल".. वगैरे वगैरे..
"तुम्हाला शेती सोडून देता येईल, तुमच्या पोरं बाळांना शेती करायची नसेल तर त्यांना सुद्धा काही वेगळे उद्योग करता येतील, त्यासाठी मी कर्ज देईन" वगैरे वगैरे..
गावातली तरूण जनता या शब्दगणिक भुलत चालली होती, नागोबाच्या पुंगीवर डुलत चालली होती.

काळ लोटला, लोक बदलले, त्या गावाचं शहर होतंय!
भरपूर पाणी, वीज, पक्के रस्ते.. बाहेरची, विदेशातली लोकं, धंद्याला, मालाला अजून उठाव, पोराबाळांचे वेगळे उद्योग, हे सगळं होता होता त्या गावचं गावपणच हरवतंय, मोठ्या मोठ्या गाड्या रस्त्यावरून फिरू लागल्या, पण त्या गाड्या वेगात जाताना रस्ता कसा ओलांडायचा हेच या गावकऱ्यांना कळत नाहीये. आपला माल कसा विकायचा आणि आपल्याला अजून अजून पैसेच कसे मिळतील याच्या मागे सगळेच पाळतायत

पण त्या गावकाऱ्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून कोणालाच सापडलं नाही, "या पैशांचं करायचं काय?"

ता. क. - या कथेचा हिंजवडीशी संबंध जाणवला तर तो योगायोग समजावा!

Wednesday, January 25, 2012

Confused.. to the core...

आज सकाळी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तीच न्यूज flash होत होती..
मन बधीर झालं..
काय.. कोण.. काहीच कळेनासं झालं होतं..
साधारण पुढचा अर्धा तास कामात लक्षच लागलं नाही..
ऑफिसच्या बाल्कनी मध्ये कॉफी चा मग घेऊन उभा होतो..
मनात आलं.. की आयुष्य किती क्षणभंगूर आहे..
सकाळी घरून निघताना.. "येतो.." असं म्हणून गेलेले लोकं कधीच पुन्हा घरी परतणार नाहीत..?
A Wednesday पिक्चर आठवला..
आपण खूप लवकर used to होऊन जातो.. आता ही गोष्ट चांगली की वाईट हे काही मला कळत नाहीये..
आणि यंदा तर अतिरेक्यांना ही दोष देता येणार नाही..
आपल्या लोकांना फोन केला.. सगळे सुखरूप आहेत नं हे चेक केलं.. channel बदलून बदलून बघितलं की नक्की काय झालं.. थोड्याफार अफवा ऐकू आल्या.. "आपण" सुरक्षित आहोत नं? मग काय तर...
सकाळी पेपर मध्ये वाचू सगळं नीट..
इतका स्वार्थी झालोय मी??
आज सकाळी मी घरून निघालो तेव्हा नीलायम theatre पाशी traffic jam होतं..
एवढी लोकं थांबून बघतायत हे बघून मला वाटलं की एखादा accident झाला असेल.. किंवा शूटिंग चालू असेल...
आपल्याला कुठला आलाय वेळ???
सकाळी ९.३० वाजता कार्ड स्वाईप झालं पाहिजे.. या नादात मी पुढे गेलो..
आणि नंतर खरंच जाणवलं.. आईचा फोन आला.. पोचलास नं नीट? असं असं झालं म्हणे तुझ्या जायच्या रस्त्यावरच..
तेव्हा मी सुद्धा तुटक तुटक च बोललो आई शी.. काम महत्त्वाचं वाटलं मला तेव्हा...
आता कळतंय... मी खरंच खूप स्वार्थी वागलो.. रादर झालोय मी स्वार्थी.. स्वतःची आणि फक्त आपल्या लोकांचीच काळजी करावीशी वाटते मला हल्ली...
दुनिया गेली तेल लावत..
पण नंतर जेव्हा मी माझ्या ताई शी gtalk वरून बोललो तेव्हा खूप जास्त हेल्पलेस वाटलं...
ताई नी समजावायचा प्रयत्न केला.. मी ही समजून घ्यायचा प्रयत्न केला..
पण मी स्वार्थी झालोय हे नक्की..
पण मग स्वार्थी झालो तर मग मला हळहळ का वाटली??
डोकं सुन्न का झालं??
तो अर्धा तास मला युगासारखा वाटला??
घरी येताना त्याच रस्त्यावर २ मिनिट थांबावसं वाटलं.. पण नाही थांबलो..
घरी जायची ओढ लागली होती..
स्वार्थीपणा बोलवत होता..


I know this is a very confused post... but really, this is exactly what I am feeling.. right now..

Monday, June 20, 2011

ती.. एक राजकन्या...


एक सुंदर रात्र... चंद्राळलेली..
तेव्हा दिसली ती..

ती.. एक राजकन्या...
हसतमुख.. चेहेऱ्यावर तेज..
पाहताक्षणीच आवडली..
डोळ्यातून अलगद काळजात उतरली..
पापण्यांच्या दारातून.. हलकेच..
देवाकडे एकच मागणं..
ती मला मिळू दे..
आणि तिचीही हीच इच्छा असू दे..

ती.. एक राजकन्या...
वातावरण भारून जातं तिच्या येण्यानी..
मातीचा सुगंध दरवळतो..
आभाळ निळाशार होतं..
आसमंत जादुई गुलाबी होतं...
खात्री आहे मला..
मी अशी व्यक्ती कधी बघितली नव्हती..

पुन्हा तीच इच्छा..
ती मला मिळू दे..
आणि तिचीही हीच इच्छा असू दे..

स्वप्नांचं एक घर बांधू..
आणि त्याच्या भिंती आपल्या प्रेमानीच रंगवू..
दिवस असतील प्रेमाचे..
रात्री असतील दवबिंदूसारख्या सुंदर..

असं खुलेल प्रेम जसा की एक चंद्र..
ताऱ्यांच्या मांदियाळीतला..

एकच मागणं..
मला ती मिळू दे..
आणि तिचीही हीच इच्छा असू दे..



love you dear.. a lot..


-omi

Tuesday, May 17, 2011

कधीच....


या चंद्राबरोबर इतकाही बोलत नव्हतो मी..
कधीच...
रात्रही होतच होती की रोज... पण इतकीही सुंदर नव्हती..
कधीच..

तुझ्या आठवणीत ती रात्रही भेटली होती.. कालच..
रात्र तीच होती..
पण ती भेट सुद्धा आपल्या भेटीसारखी "भेट" नव्हती...
कधीच..

हम्म... त्या भेटीत सुद्धा ती "उदासी" होती म्हणा..
चंद्र तारे सुद्धा तसेच होते..
पण त्यांच्याशी बोलणं आपल्या गप्पांसारखं नव्हतं..
कधीच...

तुझ्या प्रेमानी क्षणात जग बदलून गेल्यासारखं वाटतंय..
मला जाणवतंय...
मी असा नव्हतो..
कधीच....