Sunday, October 24, 2010

ऑप्टीमीजम..

हल्लीच मी जरा ओब्जर्व केलं.. लोकं खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक वगैरे झालेत.. दिवसाची सुरुवात सुमारे १ लिटर पाण्यानी होते.. आणि दिवस संपतो एका अत्यंत नीरस अशा इविनिंग वॉक नी.. आणि सोबतीला फळं, सूप्स, सलाड, ते डाळी असतात नं.. त्याला इंग्रजी मध्ये सिरेअल्स (cereals : माझा उच्चार चुकलाय बहुतेक :| ) वगैरे म्हणतात नं तसलं काहीतरी.. आणि मग ते.. "योगा", ( भारतीय लोकं "योग" म्हणायचं सोडून पाश्चात्यांसारखा योगा असा का उच्चार करतात? योगदेवताच जाणे..) पळणं ( की पळापळ?) आणि वेगवेगळे एक्जरसाईज हा डेली रुटीनचा भाग झालेत..
पण का कोणास ठाऊक.. इतकं सगळं करूनसुद्धा.. आपलं आयुष्य तसंच राहतं मरगळलेलं.. कंटाळवाणं..
आरसा आपल्याकडे बघून काय बोलतो याचा अंदाज घेत बसतो आपण.. आणि मग.. मूळ गाभाच विसरला जातो.. जगण्याचा..
"बेचव" ( चव नसणे म्हणजे 'बेचव'च नं? की वाईट चव म्हणजे 'बेचव'?) तर "बेचव" या शब्दाला साजेसा दुधीभोपळ्याचा एक ग्लास ज्यूस प्यायलो की आपल्याला वाटतं.. झाssssलं आजचं काम.. ( खरं तर.. माझ्या मते.. दुधीभोपळा हा प्रकार "हलवा" किंवा "कोफ्ते" करून खाण्याचा आहे.. पण.. काय आता.. जाऊ दे..) तर सांगण्याचा मुद्दा हा.. की आपल्याला जोपर्यंत तो बेचव ज्यूस चवीनी पिता येणार नाही.. स्वतःच्या इच्छेनी.. ( डॉक्टर किंवा डाएटीशीअन नी सांगितलं म्हणून नाही) तोपर्यंत तो ज्यूस अंगी लागणार नाही.. ( अक्चुअलि अंगी लागलायला नकोच आहे.. नाही का? :P ) त्याहूनही महत्वाचं.. चेहेऱ्यावरची फक्त एक स्मितरेषा या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकते.. आणि ही "खरीखुरी स्माईल" दिवसभर जर चेहेऱ्यावर असेल.. तर मग काय विचारायलाच नको..
सगळा मनाचा खेळ आहे हो.. आपण आपल्या आयुष्याच्या प्रेमात पडलो.. की ते सुंदर दिसणारच आहे.. रादर असणारच आहे.. आणि अगदीच.. जर नसलं.. आणि आपण म्हणत राहिलो.. तर ते खरंच सुंदर वाटायला लागतं.. ( "आल इज वेल" इफेक्ट.. ;) ) मी खरंच हा प्रकार करून बघितला.. छान वाटतं..
एखाद्या "टफ" फेज मधून जाताना.. समोर यशाचं शिखर व्यवस्थित दिसत असेल.. तर त्या कष्टांनाही "व्हावसं" वाटतं.. ते शिखर पादाक्रांत केल्यानंतर.. कोणी आपलं एक घट्ट मिठी मारणार असेल.. शाबासकीची थाप मिळणार असेल.. तर तो काट्यांनी भरलेला रस्तासुद्धा सोपा वाटायला लागतो..
आयुष्याबद्दल "किटकिट" करणाऱ्या लोकांना तर एक ठेवून द्यावीशी वाटते.. जे जगतायत त्यांना पण नीट जगू देत नाहीत.. कसंय.. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत असतात.. इथे कोणीच राजकन्येसारखा मऊ पिसांचा किंवा फुलांचा बिछाना घेऊन झोपत नाही.. आणि मी खरंच खोटं खोटं सांत्वनपर बोलू शकत नाही.. खोटी स्माईल तर त्याहून नाही.. स्वतःचा रस्ता स्वतः नाही शोधला तर कसं होणार??!!
आणि माझा रस्ता मला माझं मन दाखवतं.. माझ्याजवळ आज आता काय नाही.. याचा विचार नाही करत बसत मी.. आयुष्यावर प्रेम करायचं.. आणि देवाचे आभार मानायचे.. इतकं छान आणि धडधाकट आयुष्य दिलं म्हणून.. माझं आयुष्य सुंदर आहे.. आणि कालच्या पेक्षा आज जास्त छान आहे..
आणि हो.. मी हे मुद्दाम बोलत नाहीये.. खरंच आतून आलंय*! (burrrp :P :D )
* : "कंडीशन्स अप्लाय".. कधी कधी मनाला फोर्स करावा लागतो.. पण आता.. माझं मन तितकं सुदृढ आहे.. झालंय.. केलंय..
काही काही लोकांना हा सगळा फालतूपणा वाटतो..
तुमच्याकडे २ पर्याय आहेत..
१. या ऑप्टीमीजमला क्रीटीसाईज करणं आणि त्यावर उपरोधिक शेरे मारत बसणं..
२. आयुष्यात मस्त सकारात्मक दृष्टीकोन ठेवणं.. ती एनर्जी घेणं.. आणि रोज रिचार्ज होत राहणं..
आणि मी वर म्हणलं तसं.. संध्याकाळी फक्त "snacks" खाऊन तुम्ही किती "उपाशी" राहताय.. या पेक्षा तुम्ही कसं "जगताय" हे जास्त महत्त्वाचं आहे..
म्हणलं नं.. मनाचा खेळ आहे..
ऑप्टीमीजम स्वीकारा.. आयुष्यभर आनंदी रहा..
टिंग टिंग टीणींग :D :D


-omi

5 comments:

  1. आरसा आपल्याकडे बघून काय बोलतो याचा अंदाज घेत बसतो आपण.. आणि मग.. मूळ गाभाच विसरला जातो.. जगण्याचा..
    माझं मन तितकं सुदृढ आहे.
    ही दोन वाक्ये ...काळजाचा ठाव घेणारी...किंवा काळजावर घाव घालणारी..
    ब्लॉग ..उत्तम..
    वाचल्यानंतर थोडा तरी विचार करायला लावणं .....यातच सगळं आलं

    ReplyDelete
  2. फारच छान Omi .... स्वच्छंद विचार मांडलास सोप्या शब्दात...उत्तम!!!

    ReplyDelete
  3. मन्याशी आणि तुझ्या मनाशी सहमत आहे....

    ReplyDelete