कोणतं तरी कॉलेज दोन अडीच महिने मेहनत घेऊन एखादं नाटक बसवतं.. त्यांना जाणदेखील नसते याचे परिणाम काय होतील... एखाद्या गाजलेल्या स्पर्धेत ते त्यांचं नाटक उतरवतात.. सुरेख अभिनय करून दाखवतात.. पण समोर बसलेल्या प्रेक्षकांपैकी काही जणांच्या भावना दुखावतात.. भारत हा एक "democratic" देश आहे. इथे प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे.. म्हणून ते त्या प्रयोगातून "walkout" करतात.. पण तेव्हा ते हे विसरतात.. की समोर जे कॉलेज नाटक दाखवतंय ते कॉलेज आणि त्यांचे विद्यार्थी याच "democratic" भारताचे नागरीक आहेत.. त्यांना पण विचार स्वातंत्र्य आहे.. मान्य.. की त्या मुलांनी जे दाखवलं ते चुकलं.. नक्कीच चुकलं.. आपली तशी संस्कृती नाही... पण एखाद्या टंच आणि "हॉट" अभिनेत्रीचा bed scene यांना बघायला आवडतो.. रांगा लावून १५० रुपयांचं ticket काढून बघताच ना ते? मग या महाविद्यालयांनी जर ते नाटकात दाखवलं तर कुठे चुकलं?? असा ही एक सूर ऐकू येतो.. रंगमंदिराच्या बाहेर त्या महाविद्यालयाची प्रातिनिधिक पोस्टर्स जाळली जातात.. आम्ही आज ते घरी जातात कसे तेच बघतो.. अशा धमक्या ऐकू येतात... ही धमकी देणारी मुलं आणि त्यांचे समर्थक "आमचे संस्कृती हनन" केले म्हणून चिडलेली असतात.. पण जेव्हा एखादा या भडकलेल्या मुलांमधलाच दारू पिऊन गणपती मिरवणुकीसमोर धिंगाणा घालतो.. अश्लील हातवारे करतो.. तेव्हा ही so called "MORAL POLICE" कुठे असते?
-omi
Tuesday, August 17, 2010
Tuesday, August 10, 2010
पुन्हा एकदा.. tried to be in her shoes! :)
काही गोष्टी न सांगणं किती चांगलं असतं..
काही गोष्टी अव्यक्त राहणं किती चांगलं असतं..
त्यात एक वेगळीच मजा असते.. न व्यक्त झाल्याची हुरहुर जगण्यात एक वेगळाच आनंद असतो..
पण हे आत्ता उमगतंय.
तुझ्या प्रेमात पडून काही वर्ष उलटल्यावर असं वाटतंय. हे गुपित तसंच राहू देण्यातली मजा कळतेय. पण तेव्हा वाटायचं मनातली तडफड तुला सांगितली पाहिजे. बोलून मोकळं झालं पाहिजे. आता मात्र वाटतं की ती तडफड व्यक्त नाही झाली ते चांगलंच. मनामध्ये रुतणाऱ्या गझल नाही तर, कधी प्रत्यक्ष जगूच शकले नसते.. त्या प्रत्येक वाक्यातलं गूढ, त्यातली आर्तता, त्यातली ओढ एवढय़ा प्रकर्षांने कधी पोहोचलीच नसती माझ्यापर्यंत. आणि मग हे छान क्षणही कधी कळले नसते..
..
तुझ्यावरचं हे प्रेम स्वत:लाच सांगतेय म्हणून व्यक्त होतेय. तुझ्यापर्यंत हे पोहोचणार नाही याची काळजी घेऊन व्यक्त होतेय. पण तरी तुझ्याशीच गप्पा मारतेय.
मी तुझ्या प्रेमात पडले होते. तेव्हा कधी हे सांगितलं नाही कारण कधी शब्द फुटलेच नाहीत. तू नव्हतास ना प्रेमात पडलास
माझ्या.. मग मला काय वाटतंय हे मी कसं सांगणार होते तुला? नाही ना रे हिंमत होत, असं व्यक्त व्हायची.
पहिल्यांदा मला स्वत:ला जाणवलं ना की तुझ्या प्रेमात पडलेय तेव्हा स्वत:बद्दलच खूप विचित्र वाटलं. वाटलं, असं घडूच कसं शकतं? जी व्यक्ती आपल्या प्रेमात पडली नाही आणि पडणारही नाही, याची खात्री आहे त्या व्यक्तीबद्दल कसं असं फीलिंग येऊ शकतं?
म्हणून मग तुझ्या प्रेमात पडणं नाकारायचाही मी प्रयत्न केला. पण खरं सांगू तर तो प्रयत्न व्यर्थ ठरला. म्हणून आता तसा प्रयत्नच करत नाही. मी स्वत:ला समजावलं की मी तुझ्या प्रेमात पडले आहे, हे मी स्वीकारणं सगळ्यात गरजेचं आहे, कारण स्वत:ला फसवणं शक्य नसतं. पण एक नक्की, की इतरांना या बाबतीत फसवणं सोपं आहे, अगदी तुलाही..
तेव्हा स्वत:ला फसवू शकत नव्हते म्हणूनच मग कधी वाटायचं तुला प्रत्यक्षात सांगावं की, मला तुझ्याबद्दल काय वाटतंय. तुझ्याशी बोलायला मिळावं म्हणून मन कसं वेडं-वेडं वागतंय. तू सोबत असावास म्हणून ते कुठून, कसं धावत येतंय. अगदी सगळं सगळं सांगावं. पण तुझ्याकडे न बघता.. तू समोर असताना कुठेतरी दुसरीकडेच बघत. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचे पालटणारे भाव पाहायला लागणार नाहीत. त्यानंतर मात्र जे होईल ते होऊ दे. किमान एकदा मनातलं साचलेपण तरी निघून जाईल.
पण अशी तुझ्या खूप जवळ येऊनही मी अनेकदा मागे फिरले. प्रत्येक वेळी ओठांवरचे शब्द नि डोळ्यांतलं पाणी परतवून लावण्यात यशस्वी ठरले. हे कसं शक्य झालं ते तेव्हाही कळलं नाही नि आताही कळत नाही. काही गोष्टींची उत्तरं शोधूच नये ना..
हे सारं तुझ्यापर्यंत न पोहोचवण्याचं कारण आज वेगळं आहे. हे फीलिंग माझ्यापाशी ठेवणं आज मी एन्जॉय करतेय. पण तरी त्यात एक भीतीचा पैलू नक्की आहे. आजही असं वाटतं की तुला जर मी तुझ्या प्रेमात पडले हे कळलं ना तर आपल्या नात्याची ऊब कमी होईल. कोणत्याही नात्यात ती ऊबच महत्त्वाची असते. मग त्या नात्याला नाव असेल किंवा नसेल. काहीच फरक पडत नाही. कदाचित माझं असं तुझ्या प्रेमात पडणं तू स्वीकारशीलही. पण ते स्वीकारूनही तू दूर जाशील याबद्दल मला खात्री आहे. मला नंतर त्रास होऊ नये म्हणून असं करशील कदाचित.. पण मला तसं व्हायला नकोय. कध्धीच नकोय.
कारण तू माझ्यावर प्रेम करत नाहीस हे मी सहन करू शकते पण तुझं दूर जाणं नाही.
..
तुझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी किती वळणं घेतली माझ्या आयुष्याने.. हादेखील शेवट नाही हे माहीत आहे. पण इथे खूप काळ रेंगाळावंसं वाटतंय. आत्तापर्यंत कित्येक नाती संपवून, दूर सारून, हातातून निसटताना पाहून मी तुझ्यापर्यंत पोहोचलेय. पण यातला कोणताच प्रवास मुद्दाम घडला नव्हता. अगदी तुझ्यापर्यंतचाही.. सहज गप्पा मारता मारता तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेय. पहिला हा प्रवास घडला. त्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला आणि त्यानंतर जाणवायला लागलं मी तुझ्या प्रेमात पडले. मग सुरू झाला नवा प्रवास. तेव्हा वाटायचं, तुलाही कधी तरी मला जसं वाटतं तसंच काहीसं वाटावं माझ्याबद्दल. पण खरं सांगू तर तसं झालं असतं तर कदाचित आज या नात्याची जी अव्यक्त चव मी अनुभवतेय ती अनुभवता आली नसती. ही चव अशीच टिकवून ठेवायची आहे मला.. यापूर्वीचं प्रत्येक नातं निसटताना जाणीव झालेली होती की या नात्याची वेळ संपलीए. त्यामुळे थोडी मनाची तयारीही झालेली असायची. रडणं डोळ्यांत गढुळायचं नाही. पण तुझ्या नि माझ्या नात्याची वेळ संपलीए असं मला अजिबात वाटत नाही. म्हणूनच ते संपू द्यायचं नाही मला. मग त्यासाठी रडणं, असं तू समोर असताना डोळ्यांत गढुळलं तरी चालेल. तुझ्यासाठी, तुझ्यासमोर त्याला पाझरायची गरज नाही.
..
लहान असताना उगाच येता-जाता वाचलेल्या पुस्तकांमध्ये एक छानसं वाक्य वाचलेलं, ‘आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर आयुष्य काढण्यापेक्षा, जो माणूस आपल्यावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर आयुष्य काढणं जास्त आनंददायी असतं’. पुस्तकांवर प्रचंड विश्वास असणाऱ्या त्या वयात म्हणूनच तुलाही मी आवडावे असा हट्ट होता. पण थोडं थोडं मोठं होताना वाटत गेलं की मी कोणावर असं प्रेम करू शकतेय हे किती छान आहे.. असं आपल्या आयुष्यात कोणीतरी आहे; ज्याच्यासाठी, ज्याच्या आठवणींसोबत अख्खं आयुष्य काढता येईल, हे किती छान आहे.. या अशा छान भावनेत मी जगू शकतेय. म्हणूनच मग इतर कोणातरी सोबत आयुष्य जगणं आनंदाने नाकारू शकतेय.. माझी प्रेमाची व्याख्या म्हणजे या समाधानातल्या जगण्याची आहे. ती अपुरी असेल कदाचित. पण मला त्याचा फारसा शोध नाही घ्यायचा.. हे प्रेम मला माझ्यापुरतं उमगलंय.
कोणीतरी आवडतं, कोणीतरी काळजी घेऊ लागतं, कोणाला तरी आयुष्याचा भाग बनावसं वाटतं, एकमेकांसोबत राहायला एक छान कम्फर्ट लेव्हल येते. पण हे प्रेम असतं का? माझ्यासाठी तरी नाही. कधी वाटतंही, मी तुझ्या प्रेमात पडले तसा तूही पडला असतास तर मला नक्कीच आवडलं असतं. पण तसं नाही झालं म्हणून माझ्यावर जी व्यक्ती प्रेम करेल त्या व्यक्तीचा शोध नाही घ्यायचा मला. तो शोध संपल्यानंतर कदाचित सुरू होईल, त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगताना हव्या असलेल्या समाधानाचा शोध. त्यापेक्षा माझ्याजवळ असलेलं संचित घेऊन जगणं मला अधिक आवडतंय. हे संचित स्वत:जवळ आहे याची जाणीव किती सुंदर आहे. म्हणूनच तुझ्यासाठी, तुला न सांगता, तुझ्यावर प्रेम करत जगतानाही मी आनंदी आहे.. असं नाही केलं तर कदाचित भौतिक जगातलं सगळं सुख माझ्याजवळ असेल. पण त्या सुखाला, माझ्या चेहऱ्यावर तुझ्या आठवणीने उमलणाऱ्या आनंदाची सर येईल का?
तुझ्यावर मी प्रेम करतेय आणि तेही तुझ्या नकळत ही भावना जेवढी माझी हक्काची, स्वत:ची वाटतेय तेवढं ते सुख माझं हक्काचं नि स्वत:चं वाटेल का?
..
तूही माझ्या प्रेमात पडला असतास तर अनेक स्वप्नं जगताना तू माझ्यासोबत असतास. कधी कधी वाटतं काही वेडय़ा वेडय़ा गोष्टींमध्ये तू सोबत असावंस. रस्त्यावरून चालताना खूप गर्दी असली तर वाटत राहतं की तुझा हात धरून चालावं.. वाटतं, छानसं गाणं ऐकताना मिटल्या पापण्यांच्या आड दाटून येणारा आनंद वाटून घ्यायला तू सोबत असावंस.. जंगलातल्या वाटा तुडवताना येणारा रानफुलांचा वास घेताना तू सोबत असावंस.. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर वर येणाऱ्या पायवाटेवरची हिरवळ पाहताना तू सोबत असावंस.. पण यातलंही काहीच मी तुला सांगत नाही. चुकून तुला माझ्या प्रेमाबद्दल कळलं तर..
असं जगताना तू सोबत नसण्याची जाणिव सतत असते आणि माझं खरं जगणं या जाणिवेत आहे.
तू नसतोस म्हणूनच तुला हे सगळं सांगावंसं वाटणं, तुला मिस करणं मी मनापासून एन्जॉय करू शकते. तू तिथे नसूनही तिथे असणं अनुभवू शकते. तू सोबत असतास तर कदाचित याची परिमाणं बदलली असती. हे सारं अधिक छान-छान झालं असतं. पण याची चव त्याला नसती.
सारंच गोड-गोड असणंही कधी कधी नकोसं होतं ना..
..
असं तुझी वाट पाहणं मस्त आहे. असं जगता-जगता एक शिकलेय.. काहीसं छान हातात मिळत नाही ना तेव्हा ते कधी तरी मिळेल अशी आशा मनाला असते. येणाऱ्या काळाची मग उत्सुकतेने मन वाट बघत राहतं. खरं तर, तुझ्याबरोबरचा प्रत्येक छान क्षण मला परत अनुभवायचाय. तो प्रत्येक क्षण मला परतून यायला हवाय. पण तसं घडत नाही आणि घडणारही नाही हे मला माहिती आहे. अगदी तू सोबत असतोस तेव्हाही तसं घडणार नाही..
तुझी वाट पाहताना पाहिलेली स्वप्नं, तू सोबत आल्यावर पूर्ण होऊन संपून जाणार आहेत. त्या स्वप्नांना तिथेच पूर्णविराम मिळणार आहे. ती स्वप्नधुंदी, ते वेड मला असं हरवायचं नाही. म्हणूनच तुझ्याकडे व्यक्त न होण्याचा हा अपूर्ण काळ सुंदर आहे.
तूही माझ्यावर असं प्रेम करायला लागलास तर.. मला गेलेला प्रत्येक क्षण परत परत अनेकदा जगायची इच्छा होईल. वर्तुळ पूर्ण झालेलं दिसत असताना तेच ते वर्तुळ अनेक वेळा गिरवण्याचा प्रयत्न होईल.
म्हणून त्या वर्तुळाची दोन टोकं अशी या जन्मात तरी कधी एकत्र येऊ नयेत.
कारण परिणीता बनण्याचं स्वप्न पाहणारी अभिसारिका होणंच मला माझ्या स्वत:च्या अधिक जवळंच वाटतंय आणि भावतंयही....
काही गोष्टी अव्यक्त राहणं किती चांगलं असतं..
त्यात एक वेगळीच मजा असते.. न व्यक्त झाल्याची हुरहुर जगण्यात एक वेगळाच आनंद असतो..
पण हे आत्ता उमगतंय.
तुझ्या प्रेमात पडून काही वर्ष उलटल्यावर असं वाटतंय. हे गुपित तसंच राहू देण्यातली मजा कळतेय. पण तेव्हा वाटायचं मनातली तडफड तुला सांगितली पाहिजे. बोलून मोकळं झालं पाहिजे. आता मात्र वाटतं की ती तडफड व्यक्त नाही झाली ते चांगलंच. मनामध्ये रुतणाऱ्या गझल नाही तर, कधी प्रत्यक्ष जगूच शकले नसते.. त्या प्रत्येक वाक्यातलं गूढ, त्यातली आर्तता, त्यातली ओढ एवढय़ा प्रकर्षांने कधी पोहोचलीच नसती माझ्यापर्यंत. आणि मग हे छान क्षणही कधी कळले नसते..
..
तुझ्यावरचं हे प्रेम स्वत:लाच सांगतेय म्हणून व्यक्त होतेय. तुझ्यापर्यंत हे पोहोचणार नाही याची काळजी घेऊन व्यक्त होतेय. पण तरी तुझ्याशीच गप्पा मारतेय.
मी तुझ्या प्रेमात पडले होते. तेव्हा कधी हे सांगितलं नाही कारण कधी शब्द फुटलेच नाहीत. तू नव्हतास ना प्रेमात पडलास
माझ्या.. मग मला काय वाटतंय हे मी कसं सांगणार होते तुला? नाही ना रे हिंमत होत, असं व्यक्त व्हायची.
पहिल्यांदा मला स्वत:ला जाणवलं ना की तुझ्या प्रेमात पडलेय तेव्हा स्वत:बद्दलच खूप विचित्र वाटलं. वाटलं, असं घडूच कसं शकतं? जी व्यक्ती आपल्या प्रेमात पडली नाही आणि पडणारही नाही, याची खात्री आहे त्या व्यक्तीबद्दल कसं असं फीलिंग येऊ शकतं?
म्हणून मग तुझ्या प्रेमात पडणं नाकारायचाही मी प्रयत्न केला. पण खरं सांगू तर तो प्रयत्न व्यर्थ ठरला. म्हणून आता तसा प्रयत्नच करत नाही. मी स्वत:ला समजावलं की मी तुझ्या प्रेमात पडले आहे, हे मी स्वीकारणं सगळ्यात गरजेचं आहे, कारण स्वत:ला फसवणं शक्य नसतं. पण एक नक्की, की इतरांना या बाबतीत फसवणं सोपं आहे, अगदी तुलाही..
तेव्हा स्वत:ला फसवू शकत नव्हते म्हणूनच मग कधी वाटायचं तुला प्रत्यक्षात सांगावं की, मला तुझ्याबद्दल काय वाटतंय. तुझ्याशी बोलायला मिळावं म्हणून मन कसं वेडं-वेडं वागतंय. तू सोबत असावास म्हणून ते कुठून, कसं धावत येतंय. अगदी सगळं सगळं सांगावं. पण तुझ्याकडे न बघता.. तू समोर असताना कुठेतरी दुसरीकडेच बघत. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचे पालटणारे भाव पाहायला लागणार नाहीत. त्यानंतर मात्र जे होईल ते होऊ दे. किमान एकदा मनातलं साचलेपण तरी निघून जाईल.
पण अशी तुझ्या खूप जवळ येऊनही मी अनेकदा मागे फिरले. प्रत्येक वेळी ओठांवरचे शब्द नि डोळ्यांतलं पाणी परतवून लावण्यात यशस्वी ठरले. हे कसं शक्य झालं ते तेव्हाही कळलं नाही नि आताही कळत नाही. काही गोष्टींची उत्तरं शोधूच नये ना..
हे सारं तुझ्यापर्यंत न पोहोचवण्याचं कारण आज वेगळं आहे. हे फीलिंग माझ्यापाशी ठेवणं आज मी एन्जॉय करतेय. पण तरी त्यात एक भीतीचा पैलू नक्की आहे. आजही असं वाटतं की तुला जर मी तुझ्या प्रेमात पडले हे कळलं ना तर आपल्या नात्याची ऊब कमी होईल. कोणत्याही नात्यात ती ऊबच महत्त्वाची असते. मग त्या नात्याला नाव असेल किंवा नसेल. काहीच फरक पडत नाही. कदाचित माझं असं तुझ्या प्रेमात पडणं तू स्वीकारशीलही. पण ते स्वीकारूनही तू दूर जाशील याबद्दल मला खात्री आहे. मला नंतर त्रास होऊ नये म्हणून असं करशील कदाचित.. पण मला तसं व्हायला नकोय. कध्धीच नकोय.
कारण तू माझ्यावर प्रेम करत नाहीस हे मी सहन करू शकते पण तुझं दूर जाणं नाही.
..
तुझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी किती वळणं घेतली माझ्या आयुष्याने.. हादेखील शेवट नाही हे माहीत आहे. पण इथे खूप काळ रेंगाळावंसं वाटतंय. आत्तापर्यंत कित्येक नाती संपवून, दूर सारून, हातातून निसटताना पाहून मी तुझ्यापर्यंत पोहोचलेय. पण यातला कोणताच प्रवास मुद्दाम घडला नव्हता. अगदी तुझ्यापर्यंतचाही.. सहज गप्पा मारता मारता तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेय. पहिला हा प्रवास घडला. त्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला आणि त्यानंतर जाणवायला लागलं मी तुझ्या प्रेमात पडले. मग सुरू झाला नवा प्रवास. तेव्हा वाटायचं, तुलाही कधी तरी मला जसं वाटतं तसंच काहीसं वाटावं माझ्याबद्दल. पण खरं सांगू तर तसं झालं असतं तर कदाचित आज या नात्याची जी अव्यक्त चव मी अनुभवतेय ती अनुभवता आली नसती. ही चव अशीच टिकवून ठेवायची आहे मला.. यापूर्वीचं प्रत्येक नातं निसटताना जाणीव झालेली होती की या नात्याची वेळ संपलीए. त्यामुळे थोडी मनाची तयारीही झालेली असायची. रडणं डोळ्यांत गढुळायचं नाही. पण तुझ्या नि माझ्या नात्याची वेळ संपलीए असं मला अजिबात वाटत नाही. म्हणूनच ते संपू द्यायचं नाही मला. मग त्यासाठी रडणं, असं तू समोर असताना डोळ्यांत गढुळलं तरी चालेल. तुझ्यासाठी, तुझ्यासमोर त्याला पाझरायची गरज नाही.
..
लहान असताना उगाच येता-जाता वाचलेल्या पुस्तकांमध्ये एक छानसं वाक्य वाचलेलं, ‘आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर आयुष्य काढण्यापेक्षा, जो माणूस आपल्यावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर आयुष्य काढणं जास्त आनंददायी असतं’. पुस्तकांवर प्रचंड विश्वास असणाऱ्या त्या वयात म्हणूनच तुलाही मी आवडावे असा हट्ट होता. पण थोडं थोडं मोठं होताना वाटत गेलं की मी कोणावर असं प्रेम करू शकतेय हे किती छान आहे.. असं आपल्या आयुष्यात कोणीतरी आहे; ज्याच्यासाठी, ज्याच्या आठवणींसोबत अख्खं आयुष्य काढता येईल, हे किती छान आहे.. या अशा छान भावनेत मी जगू शकतेय. म्हणूनच मग इतर कोणातरी सोबत आयुष्य जगणं आनंदाने नाकारू शकतेय.. माझी प्रेमाची व्याख्या म्हणजे या समाधानातल्या जगण्याची आहे. ती अपुरी असेल कदाचित. पण मला त्याचा फारसा शोध नाही घ्यायचा.. हे प्रेम मला माझ्यापुरतं उमगलंय.
कोणीतरी आवडतं, कोणीतरी काळजी घेऊ लागतं, कोणाला तरी आयुष्याचा भाग बनावसं वाटतं, एकमेकांसोबत राहायला एक छान कम्फर्ट लेव्हल येते. पण हे प्रेम असतं का? माझ्यासाठी तरी नाही. कधी वाटतंही, मी तुझ्या प्रेमात पडले तसा तूही पडला असतास तर मला नक्कीच आवडलं असतं. पण तसं नाही झालं म्हणून माझ्यावर जी व्यक्ती प्रेम करेल त्या व्यक्तीचा शोध नाही घ्यायचा मला. तो शोध संपल्यानंतर कदाचित सुरू होईल, त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगताना हव्या असलेल्या समाधानाचा शोध. त्यापेक्षा माझ्याजवळ असलेलं संचित घेऊन जगणं मला अधिक आवडतंय. हे संचित स्वत:जवळ आहे याची जाणीव किती सुंदर आहे. म्हणूनच तुझ्यासाठी, तुला न सांगता, तुझ्यावर प्रेम करत जगतानाही मी आनंदी आहे.. असं नाही केलं तर कदाचित भौतिक जगातलं सगळं सुख माझ्याजवळ असेल. पण त्या सुखाला, माझ्या चेहऱ्यावर तुझ्या आठवणीने उमलणाऱ्या आनंदाची सर येईल का?
तुझ्यावर मी प्रेम करतेय आणि तेही तुझ्या नकळत ही भावना जेवढी माझी हक्काची, स्वत:ची वाटतेय तेवढं ते सुख माझं हक्काचं नि स्वत:चं वाटेल का?
..
तूही माझ्या प्रेमात पडला असतास तर अनेक स्वप्नं जगताना तू माझ्यासोबत असतास. कधी कधी वाटतं काही वेडय़ा वेडय़ा गोष्टींमध्ये तू सोबत असावंस. रस्त्यावरून चालताना खूप गर्दी असली तर वाटत राहतं की तुझा हात धरून चालावं.. वाटतं, छानसं गाणं ऐकताना मिटल्या पापण्यांच्या आड दाटून येणारा आनंद वाटून घ्यायला तू सोबत असावंस.. जंगलातल्या वाटा तुडवताना येणारा रानफुलांचा वास घेताना तू सोबत असावंस.. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर वर येणाऱ्या पायवाटेवरची हिरवळ पाहताना तू सोबत असावंस.. पण यातलंही काहीच मी तुला सांगत नाही. चुकून तुला माझ्या प्रेमाबद्दल कळलं तर..
असं जगताना तू सोबत नसण्याची जाणिव सतत असते आणि माझं खरं जगणं या जाणिवेत आहे.
तू नसतोस म्हणूनच तुला हे सगळं सांगावंसं वाटणं, तुला मिस करणं मी मनापासून एन्जॉय करू शकते. तू तिथे नसूनही तिथे असणं अनुभवू शकते. तू सोबत असतास तर कदाचित याची परिमाणं बदलली असती. हे सारं अधिक छान-छान झालं असतं. पण याची चव त्याला नसती.
सारंच गोड-गोड असणंही कधी कधी नकोसं होतं ना..
..
असं तुझी वाट पाहणं मस्त आहे. असं जगता-जगता एक शिकलेय.. काहीसं छान हातात मिळत नाही ना तेव्हा ते कधी तरी मिळेल अशी आशा मनाला असते. येणाऱ्या काळाची मग उत्सुकतेने मन वाट बघत राहतं. खरं तर, तुझ्याबरोबरचा प्रत्येक छान क्षण मला परत अनुभवायचाय. तो प्रत्येक क्षण मला परतून यायला हवाय. पण तसं घडत नाही आणि घडणारही नाही हे मला माहिती आहे. अगदी तू सोबत असतोस तेव्हाही तसं घडणार नाही..
तुझी वाट पाहताना पाहिलेली स्वप्नं, तू सोबत आल्यावर पूर्ण होऊन संपून जाणार आहेत. त्या स्वप्नांना तिथेच पूर्णविराम मिळणार आहे. ती स्वप्नधुंदी, ते वेड मला असं हरवायचं नाही. म्हणूनच तुझ्याकडे व्यक्त न होण्याचा हा अपूर्ण काळ सुंदर आहे.
तूही माझ्यावर असं प्रेम करायला लागलास तर.. मला गेलेला प्रत्येक क्षण परत परत अनेकदा जगायची इच्छा होईल. वर्तुळ पूर्ण झालेलं दिसत असताना तेच ते वर्तुळ अनेक वेळा गिरवण्याचा प्रयत्न होईल.
म्हणून त्या वर्तुळाची दोन टोकं अशी या जन्मात तरी कधी एकत्र येऊ नयेत.
कारण परिणीता बनण्याचं स्वप्न पाहणारी अभिसारिका होणंच मला माझ्या स्वत:च्या अधिक जवळंच वाटतंय आणि भावतंयही....
Labels:
omkarkukade,
panorama
Friday, July 30, 2010
उघडीप...
आज बऱ्याच दिवसानंतर जरा उघडीप मिळाली..
पाऊस थांबला..
मन वेगळ्या दिशेनी धावू लागलं..
पण...
पळता पळता थोडी काळजी घ्यावी लागते..
कधी कधी ठेच लागते..
आणि जेव्हा आपणच सगळ्यात पुढे असतो.. तेव्हा तर शहाणंही स्वतःलाच व्हावं लागतं..
आज रस्त्यांवरून जाताना जाणवलं...
पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्याला सुद्धा किती जखमा झाल्या आहेत..
आजच्या उघडिपीमुळे त्या जरा कोरड्या पडल्या आहेत..
ओल्या जखमा कधीच बऱ्या होत नाहीत.. आणि कायम ठसठसत राहतात..
रस्त्यांना पण या जखमा अशाच ठसठसत असतील का??
पाणी साचलेल्या जखमांवरून वाहनं जोरात जातात..
पाणी उडवतात... रस्ता तेवढ्या भागात मोकळा होतो.. सालपट निघतं..
पावसानी उघडीप दिली तरी तो जखमा मागे ठेवून जातो..
उन्मळून पडलेली झाडं, ती सुद्धा पावसाच्या आणि बेभान सुटलेल्या वाऱ्याच्या विरोधात जातात आणि पाऊस त्यांना कायमची जखम देऊन जातो..
ती फक्त झाडं नसतात.. त्यावर कोणाचं तरी घरट असतं.. कोणाची तरी ढोली असते..
ते घर आता आपल्यासाठी नाही हे feeling प्राणी आणि पक्ष्यांना आल्यावर त्यांना कसं वाटत असेल..?
उघडिपीनंतर ते ही नवीन जोमानी कामाला लागतील?? का डोक्याला हात लावून बसतील..???
अशी ही उघडीप....
हवीहवीशी.. कधी कधी नको नकोशी..
-omi
पाऊस थांबला..
मन वेगळ्या दिशेनी धावू लागलं..
पण...
पळता पळता थोडी काळजी घ्यावी लागते..
कधी कधी ठेच लागते..
आणि जेव्हा आपणच सगळ्यात पुढे असतो.. तेव्हा तर शहाणंही स्वतःलाच व्हावं लागतं..
आज रस्त्यांवरून जाताना जाणवलं...
पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्याला सुद्धा किती जखमा झाल्या आहेत..
आजच्या उघडिपीमुळे त्या जरा कोरड्या पडल्या आहेत..
ओल्या जखमा कधीच बऱ्या होत नाहीत.. आणि कायम ठसठसत राहतात..
रस्त्यांना पण या जखमा अशाच ठसठसत असतील का??
पाणी साचलेल्या जखमांवरून वाहनं जोरात जातात..
पाणी उडवतात... रस्ता तेवढ्या भागात मोकळा होतो.. सालपट निघतं..
पावसानी उघडीप दिली तरी तो जखमा मागे ठेवून जातो..
उन्मळून पडलेली झाडं, ती सुद्धा पावसाच्या आणि बेभान सुटलेल्या वाऱ्याच्या विरोधात जातात आणि पाऊस त्यांना कायमची जखम देऊन जातो..
ती फक्त झाडं नसतात.. त्यावर कोणाचं तरी घरट असतं.. कोणाची तरी ढोली असते..
ते घर आता आपल्यासाठी नाही हे feeling प्राणी आणि पक्ष्यांना आल्यावर त्यांना कसं वाटत असेल..?
उघडिपीनंतर ते ही नवीन जोमानी कामाला लागतील?? का डोक्याला हात लावून बसतील..???
अशी ही उघडीप....
हवीहवीशी.. कधी कधी नको नकोशी..
-omi
Labels:
omkarkukade,
panorama
Friday, July 23, 2010
just tried to be in her shoes! :|
after a break up.... happy "she"..
तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं नाही असं ठरवलं तेव्हा भरपूर बोलणी खायला लागली. तू न बोलताही खूप बोललास. पण लग्न म्हणजेच आयुष्याची इतिश्री असं मला कधी वाटलंच नव्हतं. त्याही पलीकडे आयुष्य असतं आणि तेच तुझ्यासोबत मला जगायचं होतं. पण तसं जगणं तुला शक्य नव्हतं, त्यामुळे माझी स्वप्नं तुझ्यावर लादण्यातही अर्थ नव्हता.
स्वप्नांचा मागोवा घेत आयुष्यभर जगावं असं अनेकदा वाटतं. पण या स्वप्नांचा मागोवा घेताना कधीतरी एकटय़ानेच प्रवास करायला लागतो. सोबत कोणी नसतं. कधी ही स्वप्नं कोणाला समजणारी नसतात तर कधी या स्वप्नांना दुसरं कोणी त्यांना पूर्ण केलेलं आवडत नाही. मग असं एकटं-एकटं जगणंच ऊबदार वाटायला लागतं.
------------------------------------------------------
स्वप्नांसाठी नाती की नात्यांसाठी स्वप्नं ??
------------------------------------------------------
खरं तर मी पाहिलेली आयुष्यातली स्वप्नंही धूसरच होती. त्यामुळे नेमकं काय हवंय आपल्याला आयुष्याकडून वगैरे अजिबात माहिती नव्हतं. पण ही स्वप्नं चौकटीतली नव्हती. त्यामुळे तसं जगताही आलं नसतं. डोळ्यात स्वप्नं घेऊन असं चौकटीतलं
हसू चेहऱ्यावर बाळगताना आयुष्य संपून गेलं असतं आणि मग काहीच केलं नाही अशी खंत शेवटच्या क्षणी वाटली असती.
आणि ते चौकटीतलं जगायचं नसेल तर कोणाशी आयुष्यभर असं बांधून राहता येत नाही. म्हणूनच कोणाशीच आयुष्य बांधून घ्यायचं नाही असं ठरवलं. आणि त्या बंधनाशिवाय तुला जगता आलं नसतं म्हणून तूही नकोस सोबत असं सांगून निघून आले.
------------------------------------------------------
मी तुला असं एकटं सोडून आले तेव्हा तुझी किती घालमेल झाली असेल याचा तसा थोडासा अंदाज आहे. पूर्ण कधीच येऊ शकत नाही कारण मी वेगळीच वाट चोखाळली. माझी काही स्वप्नं पूर्ण होत होती त्यामुळे तुझी वेदना पूर्णत्वाने नाही समजून घेता आली.
खरं तर ही स्वप्नं पहिल्यांदा जेव्हा पाहिली तेव्हा ती तुलाच सांगितलेली. त्यातली काही स्वप्नं पाहताना तूही होतास सोबत. म्हणूनच ती पूर्ण होतानाही तू सोबत असतास तर खूप आवडलं असतं. पण काळ थोडासा बदलला तशी तुझी काही स्वप्नं बदलली. आणि आपल्या दोघांनाही त्याची जाणीव झाली होती.
मी अशी निघून गेले तेव्हा तू रडला असशील ना. खूप संताप आला असेल माझा. पण तू तेही माझ्यासमोर व्यक्त केलं नाहीस.. एकदाच माझ्याकडे पाहिलंस आणि हे अपेक्षित होतं असं म्हणून विषय संपवलास. मी सर्वसाधारण आयुष्य जगणार नाही याची तुला अधूनमधून जाणीव होत होती ना?
खरं तर छान, सुखी संसाराची स्वप्नं मला पडतच नव्हती. मला स्वप्नं पडत होती ती आयुष्य जगायला विसरलेल्यांना पुन्हा जगायला शिकवण्याची.. कोणाला तरी हसू वाटण्याची.. कोणाला तरी आनंद वेचायला शिकवण्याची. अशी साधी-सोपी स्वप्नं..
तसं तुला अनेकदा बोलूनही दाखवलं होतं मी. पण त्यासाठी मी खरंच कधी तुला असं सोडून जाईन असं वाटलं नव्हतं ना?
खरं सांगू तर सर्वसाधारण आयुष्य जगताना सगळ्या जबाबदाऱ्या पेलत मला माझी ही स्वप्नं पूर्ण करणं शक्यच झालं नसतं. म्हणजे समाजसेवा वगैरे करण्याचं वेड डोक्यात नव्हतं. समाजसेवकाचं लेबल घेऊन तर अजिबातच जगायचं नव्हतं. त्याचा तर खूपच तिटकारा. पण गरज असलेल्यांना मला पाठिंबा द्यायचा होता.
असं तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटतं की कोणाला तरी गरज असल्यावर आपण तिथे असावं. त्या कोणीतरी हक्काने आपल्याला येऊन मदत हवीए असं सांगावं नि आपण तशाच सहजपणे त्या कोणाला तरी मदत करावी.
हे आज जेव्हा प्रत्यक्षात जगतेय ना तेव्हा असं वाटतं की तुला गरज असताना मी तुझ्यासोबत नाही हे किती वाईट. सगळ्या जगासाठी धडपडताना स्वत:च्याच माणसांसोबत राहता येत नाही.
पण काही तरी मिळवताना काही तरी हरवतंच ना? हे माझं स्वत:ला समजावणं आहे की तुला..
पण एक मात्र नक्की की तुझी स्वप्नं आणि माझी स्वप्नं अशी वेगळ्या वाटांवरून चालत खूप दूर गेली होती. एकमेकांकडे पाठ फिरवून ती चालती झालेली. ती कधी एकमेकांना रस्त्यात भेटलीही नसती. म्हणूनच मला अट्टहास नव्हता करायचा त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा. कारण या दोन वेगळ्या रस्त्यांवरची स्वप्नं जगताना माझी खूप ओढाताण झाली असती. आणि कदाचित तुझीही..
---------------------------------------------------------------------
तुझी स्वप्नं मी कधी माझी म्हणून जगलेच नाही. मला तसं जगताच येत नव्हतं. मी प्रयत्न करून पाहिला पण तो व्यर्थ ठरला. माझं जगणं तेव्हा माझं उरलं नव्हतं. त्यामध्ये कृत्रिमपणा आलेला आणि प्रत्येक वेळी तुझ्याशी, तुझ्या स्वप्नांशी जुळवून घ्यायची धडपड फक्त त्यात खरी होती. बाकी सारं उसनं अवसान. तुझं नि माझं नातं तुटू नये म्हणून केलेले प्रयत्न.
खरं तर असे प्रयत्न करण्यात चूक काहीच नाही. प्रत्येकालाच आयुष्यात अॅडजस्ट करायला लागतं. पण ही अॅडजस्टमेंट स्वत:ला पूर्णपणे बदलवणारी नसावी ना? स्वत:चं अस्तित्व संपवून मी तुला हवी तशी बनण्याचा प्रयत्न करत होते. पण ते फार काळ टिकलं नसतं. तुला ना मला दुखवता येत होतं ना स्वत:ला बदलता येत होतं. माझंही कदाचित तसंच होत होतं. मला स्वत:ला बदलता येत नव्हतं आणि नात्याच्या त्या ओढाताणीमध्ये तू दुखावलं गेलेलं मला आवडलं नसतं.
त्यातूनच आपल्यातला निखळपणा हरवत चाललेला जाणवला. आपला संवाद कधी विसंवाद नाही झाला पण त्यातला मनमोकळेपणा संपलेला. आपल्याला एकमेकांशी बोलायला मुद्दाम काही विषय शोधायला लागत होते. आपण एखादा विषय खूप काळ चघळत बसत होतो केवळ एकमेकांसोबत राहायचं म्हणून. नंतर आपल्या आयुष्याचंही असंच झालं असतं ना? मग दोघांचीही घुसमट वाढली असती.. ही घुसमट होऊ नये म्हणून कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. तू असा निरोप घेणं अशक्य होतं म्हणून मी तो घेतला.
---------------------------------------------------------
तुला जेव्हा सांगितलं ना मी की मला माझ्या स्वप्नांमागे जायचंय, त्या वेळी माझ्या डोक्यावरचं खूप ओझं उतरल्यासारखं वाटलं.
तुला किमान माझी स्वप्नं पूर्वीसारखी मोकळेपणाने मी सांगू शकणार होते याचा मला आनंद वाटला. मैत्रीच्या पलीकडच्या नात्यात जेव्हा अडकले होते ना, तेव्हा ही स्वप्नं सांगताच येत नव्हती तुला मोकळेपणाने. मनावर कायम एक दडपण होतं. ती सांगता येत नव्हती तर ती पूर्ण कशी करणार होते मी?
आणि तुझ्यासोबत असं एक आखीव-रेखीव नातं जगताना दुसरी अशी आकार-उकार नसलेली नाती जगू शकेन हा विश्वासच नव्हता. इतर कोणाहीसोबत राहिले तरी ही खात्री देता येत नाही. केवळ तात्पुरत्या आधाराच्या अपेक्षेत असलेल्या आणि सुरूवात नि शेवट नसलेल्या त्या नात्यांमध्येही अर्थ शोधले जातील.
मग कोणतंच नातं मनापासून जगता येणार नाही.
म्हणूनच आता एकटं जगायचंय.
------------------------------------------------------
खरंच, नातं तुटण्यापेक्षा ते हळूहळू मिटणं जास्त चांगलं असतं.
काही गोष्टी भांडून संपतात, काही गोष्टी चर्चेनंतर संपतात पण काही वेळा असं काहीच करावसं वाटत नाही. त्याचा उपयोग नसतो हे ठाऊक असतं कदाचित त्या वेळी..
आपण एकत्र जगलो असतो तर अशा अनेक चर्चा किंवा भांडणं झाली असती आणि मग आपलं नातं तुटायला कितीसा वेळ लागला असता. मला नव्हतं संपवायचं ते नातं असं.
आपल्या नात्याचं हे पूर्णत: बदललेलं स्वरूप पाहवलंही नसतं.
त्या वेदना किती भयानक असतात..
किती छान स्वप्नं पाहिलेली तुझ्यासोबत. हे नातं निर्माण होण्याआधी एकमेकांच्या स्वप्नांवरच भाळलेलो ना आपण. मग त्याच स्वप्नांचा दुस्वास तरी कसा सहन झाला असता..
ते नातं जितक्या हळुवारपणे उलगडलं तितक्याच हळुवारपणे ते आज मिटल्या अवस्थेत आहे. त्या नात्याला पूर्णविराम दिला आहे का याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ते तिथेच एका वळणावर सोडून दिलं आहे. आणि त्याची ही अवस्था अधिक सुंदर आहे.
-------------------------------------------------------------
दुसऱ्या कोणासोबत का नाही पाहायची ही स्वप्नं?
अनेकदा निर्माण झालेला हा प्रश्न. पण हा प्रश्नच खूप हास्यास्पद वाटतो मला. हा प्रश्न विचारणाऱ्यांची खूप कीवही करावीशी वाटते.
कशी पाहता येतील एकदा पाहिलेली स्वप्नं पुन्हा-पुन्हा..
खरं तर या स्वप्नांना पाठिंब्याची गरज नाही. कधी तरी सोबतीची गरज नक्की आहे. पण तीही नाही मिळाली तर त्यांच्यामध्ये एकटं उभं राहायची ताकद आहे.
जेव्हा दुसऱ्यांना सावरायची स्वप्नं पाहिली जातात ना तेव्हा त्या स्वप्नांमध्येच धडपडायची आणि पुन्हा उभं राहायची ताकद येते.
आणि खरं तर या मार्गावर चालताना आता जाणवतंय की हा प्रवास एकटय़ाचा नाही. मदतीची अपेक्षा बाळगणारे अनेक जण येतात आणि जातात. काही काळ का होईना त्यांची सोबत तर असतेच.
कदाचित अशी स्वप्नं पाहणारे अनेक प्रवाह उद्या माझ्यासोबत असतील. कसलीच आशा-अपेक्षा नसलेल्या या उद्याची आत्ताच का चिंता करायची..
--------------------------------------------------------------------
स्वप्नांच्या मागे अशी वेडय़ासारखी धावत सुटल्यावर कधी दमही लागतो. तेव्हा कधी तरी वाटतंही की कोणीतरी हात धरावा म्हणजे पुढचा डोंगर चढणं अधिक सोपं होईल.
पण असं आपल्यासोबत कोणी नाही ही जाणीव होते ना तेव्हा पुढची पावलं अधिक निर्धाराने पडतात आणि निर्धाराने पडलेलं प्रत्येक पाऊल अनोखा आनंद देऊन जातं..
--------------------------------------------------------------------
-omi
तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं नाही असं ठरवलं तेव्हा भरपूर बोलणी खायला लागली. तू न बोलताही खूप बोललास. पण लग्न म्हणजेच आयुष्याची इतिश्री असं मला कधी वाटलंच नव्हतं. त्याही पलीकडे आयुष्य असतं आणि तेच तुझ्यासोबत मला जगायचं होतं. पण तसं जगणं तुला शक्य नव्हतं, त्यामुळे माझी स्वप्नं तुझ्यावर लादण्यातही अर्थ नव्हता.
स्वप्नांचा मागोवा घेत आयुष्यभर जगावं असं अनेकदा वाटतं. पण या स्वप्नांचा मागोवा घेताना कधीतरी एकटय़ानेच प्रवास करायला लागतो. सोबत कोणी नसतं. कधी ही स्वप्नं कोणाला समजणारी नसतात तर कधी या स्वप्नांना दुसरं कोणी त्यांना पूर्ण केलेलं आवडत नाही. मग असं एकटं-एकटं जगणंच ऊबदार वाटायला लागतं.
------------------------------------------------------
स्वप्नांसाठी नाती की नात्यांसाठी स्वप्नं ??
------------------------------------------------------
खरं तर मी पाहिलेली आयुष्यातली स्वप्नंही धूसरच होती. त्यामुळे नेमकं काय हवंय आपल्याला आयुष्याकडून वगैरे अजिबात माहिती नव्हतं. पण ही स्वप्नं चौकटीतली नव्हती. त्यामुळे तसं जगताही आलं नसतं. डोळ्यात स्वप्नं घेऊन असं चौकटीतलं
हसू चेहऱ्यावर बाळगताना आयुष्य संपून गेलं असतं आणि मग काहीच केलं नाही अशी खंत शेवटच्या क्षणी वाटली असती.
आणि ते चौकटीतलं जगायचं नसेल तर कोणाशी आयुष्यभर असं बांधून राहता येत नाही. म्हणूनच कोणाशीच आयुष्य बांधून घ्यायचं नाही असं ठरवलं. आणि त्या बंधनाशिवाय तुला जगता आलं नसतं म्हणून तूही नकोस सोबत असं सांगून निघून आले.
------------------------------------------------------
मी तुला असं एकटं सोडून आले तेव्हा तुझी किती घालमेल झाली असेल याचा तसा थोडासा अंदाज आहे. पूर्ण कधीच येऊ शकत नाही कारण मी वेगळीच वाट चोखाळली. माझी काही स्वप्नं पूर्ण होत होती त्यामुळे तुझी वेदना पूर्णत्वाने नाही समजून घेता आली.
खरं तर ही स्वप्नं पहिल्यांदा जेव्हा पाहिली तेव्हा ती तुलाच सांगितलेली. त्यातली काही स्वप्नं पाहताना तूही होतास सोबत. म्हणूनच ती पूर्ण होतानाही तू सोबत असतास तर खूप आवडलं असतं. पण काळ थोडासा बदलला तशी तुझी काही स्वप्नं बदलली. आणि आपल्या दोघांनाही त्याची जाणीव झाली होती.
मी अशी निघून गेले तेव्हा तू रडला असशील ना. खूप संताप आला असेल माझा. पण तू तेही माझ्यासमोर व्यक्त केलं नाहीस.. एकदाच माझ्याकडे पाहिलंस आणि हे अपेक्षित होतं असं म्हणून विषय संपवलास. मी सर्वसाधारण आयुष्य जगणार नाही याची तुला अधूनमधून जाणीव होत होती ना?
खरं तर छान, सुखी संसाराची स्वप्नं मला पडतच नव्हती. मला स्वप्नं पडत होती ती आयुष्य जगायला विसरलेल्यांना पुन्हा जगायला शिकवण्याची.. कोणाला तरी हसू वाटण्याची.. कोणाला तरी आनंद वेचायला शिकवण्याची. अशी साधी-सोपी स्वप्नं..
तसं तुला अनेकदा बोलूनही दाखवलं होतं मी. पण त्यासाठी मी खरंच कधी तुला असं सोडून जाईन असं वाटलं नव्हतं ना?
खरं सांगू तर सर्वसाधारण आयुष्य जगताना सगळ्या जबाबदाऱ्या पेलत मला माझी ही स्वप्नं पूर्ण करणं शक्यच झालं नसतं. म्हणजे समाजसेवा वगैरे करण्याचं वेड डोक्यात नव्हतं. समाजसेवकाचं लेबल घेऊन तर अजिबातच जगायचं नव्हतं. त्याचा तर खूपच तिटकारा. पण गरज असलेल्यांना मला पाठिंबा द्यायचा होता.
असं तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटतं की कोणाला तरी गरज असल्यावर आपण तिथे असावं. त्या कोणीतरी हक्काने आपल्याला येऊन मदत हवीए असं सांगावं नि आपण तशाच सहजपणे त्या कोणाला तरी मदत करावी.
हे आज जेव्हा प्रत्यक्षात जगतेय ना तेव्हा असं वाटतं की तुला गरज असताना मी तुझ्यासोबत नाही हे किती वाईट. सगळ्या जगासाठी धडपडताना स्वत:च्याच माणसांसोबत राहता येत नाही.
पण काही तरी मिळवताना काही तरी हरवतंच ना? हे माझं स्वत:ला समजावणं आहे की तुला..
पण एक मात्र नक्की की तुझी स्वप्नं आणि माझी स्वप्नं अशी वेगळ्या वाटांवरून चालत खूप दूर गेली होती. एकमेकांकडे पाठ फिरवून ती चालती झालेली. ती कधी एकमेकांना रस्त्यात भेटलीही नसती. म्हणूनच मला अट्टहास नव्हता करायचा त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा. कारण या दोन वेगळ्या रस्त्यांवरची स्वप्नं जगताना माझी खूप ओढाताण झाली असती. आणि कदाचित तुझीही..
---------------------------------------------------------------------
तुझी स्वप्नं मी कधी माझी म्हणून जगलेच नाही. मला तसं जगताच येत नव्हतं. मी प्रयत्न करून पाहिला पण तो व्यर्थ ठरला. माझं जगणं तेव्हा माझं उरलं नव्हतं. त्यामध्ये कृत्रिमपणा आलेला आणि प्रत्येक वेळी तुझ्याशी, तुझ्या स्वप्नांशी जुळवून घ्यायची धडपड फक्त त्यात खरी होती. बाकी सारं उसनं अवसान. तुझं नि माझं नातं तुटू नये म्हणून केलेले प्रयत्न.
खरं तर असे प्रयत्न करण्यात चूक काहीच नाही. प्रत्येकालाच आयुष्यात अॅडजस्ट करायला लागतं. पण ही अॅडजस्टमेंट स्वत:ला पूर्णपणे बदलवणारी नसावी ना? स्वत:चं अस्तित्व संपवून मी तुला हवी तशी बनण्याचा प्रयत्न करत होते. पण ते फार काळ टिकलं नसतं. तुला ना मला दुखवता येत होतं ना स्वत:ला बदलता येत होतं. माझंही कदाचित तसंच होत होतं. मला स्वत:ला बदलता येत नव्हतं आणि नात्याच्या त्या ओढाताणीमध्ये तू दुखावलं गेलेलं मला आवडलं नसतं.
त्यातूनच आपल्यातला निखळपणा हरवत चाललेला जाणवला. आपला संवाद कधी विसंवाद नाही झाला पण त्यातला मनमोकळेपणा संपलेला. आपल्याला एकमेकांशी बोलायला मुद्दाम काही विषय शोधायला लागत होते. आपण एखादा विषय खूप काळ चघळत बसत होतो केवळ एकमेकांसोबत राहायचं म्हणून. नंतर आपल्या आयुष्याचंही असंच झालं असतं ना? मग दोघांचीही घुसमट वाढली असती.. ही घुसमट होऊ नये म्हणून कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. तू असा निरोप घेणं अशक्य होतं म्हणून मी तो घेतला.
---------------------------------------------------------
तुला जेव्हा सांगितलं ना मी की मला माझ्या स्वप्नांमागे जायचंय, त्या वेळी माझ्या डोक्यावरचं खूप ओझं उतरल्यासारखं वाटलं.
तुला किमान माझी स्वप्नं पूर्वीसारखी मोकळेपणाने मी सांगू शकणार होते याचा मला आनंद वाटला. मैत्रीच्या पलीकडच्या नात्यात जेव्हा अडकले होते ना, तेव्हा ही स्वप्नं सांगताच येत नव्हती तुला मोकळेपणाने. मनावर कायम एक दडपण होतं. ती सांगता येत नव्हती तर ती पूर्ण कशी करणार होते मी?
आणि तुझ्यासोबत असं एक आखीव-रेखीव नातं जगताना दुसरी अशी आकार-उकार नसलेली नाती जगू शकेन हा विश्वासच नव्हता. इतर कोणाहीसोबत राहिले तरी ही खात्री देता येत नाही. केवळ तात्पुरत्या आधाराच्या अपेक्षेत असलेल्या आणि सुरूवात नि शेवट नसलेल्या त्या नात्यांमध्येही अर्थ शोधले जातील.
मग कोणतंच नातं मनापासून जगता येणार नाही.
म्हणूनच आता एकटं जगायचंय.
------------------------------------------------------
खरंच, नातं तुटण्यापेक्षा ते हळूहळू मिटणं जास्त चांगलं असतं.
काही गोष्टी भांडून संपतात, काही गोष्टी चर्चेनंतर संपतात पण काही वेळा असं काहीच करावसं वाटत नाही. त्याचा उपयोग नसतो हे ठाऊक असतं कदाचित त्या वेळी..
आपण एकत्र जगलो असतो तर अशा अनेक चर्चा किंवा भांडणं झाली असती आणि मग आपलं नातं तुटायला कितीसा वेळ लागला असता. मला नव्हतं संपवायचं ते नातं असं.
आपल्या नात्याचं हे पूर्णत: बदललेलं स्वरूप पाहवलंही नसतं.
त्या वेदना किती भयानक असतात..
किती छान स्वप्नं पाहिलेली तुझ्यासोबत. हे नातं निर्माण होण्याआधी एकमेकांच्या स्वप्नांवरच भाळलेलो ना आपण. मग त्याच स्वप्नांचा दुस्वास तरी कसा सहन झाला असता..
ते नातं जितक्या हळुवारपणे उलगडलं तितक्याच हळुवारपणे ते आज मिटल्या अवस्थेत आहे. त्या नात्याला पूर्णविराम दिला आहे का याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ते तिथेच एका वळणावर सोडून दिलं आहे. आणि त्याची ही अवस्था अधिक सुंदर आहे.
-------------------------------------------------------------
दुसऱ्या कोणासोबत का नाही पाहायची ही स्वप्नं?
अनेकदा निर्माण झालेला हा प्रश्न. पण हा प्रश्नच खूप हास्यास्पद वाटतो मला. हा प्रश्न विचारणाऱ्यांची खूप कीवही करावीशी वाटते.
कशी पाहता येतील एकदा पाहिलेली स्वप्नं पुन्हा-पुन्हा..
खरं तर या स्वप्नांना पाठिंब्याची गरज नाही. कधी तरी सोबतीची गरज नक्की आहे. पण तीही नाही मिळाली तर त्यांच्यामध्ये एकटं उभं राहायची ताकद आहे.
जेव्हा दुसऱ्यांना सावरायची स्वप्नं पाहिली जातात ना तेव्हा त्या स्वप्नांमध्येच धडपडायची आणि पुन्हा उभं राहायची ताकद येते.
आणि खरं तर या मार्गावर चालताना आता जाणवतंय की हा प्रवास एकटय़ाचा नाही. मदतीची अपेक्षा बाळगणारे अनेक जण येतात आणि जातात. काही काळ का होईना त्यांची सोबत तर असतेच.
कदाचित अशी स्वप्नं पाहणारे अनेक प्रवाह उद्या माझ्यासोबत असतील. कसलीच आशा-अपेक्षा नसलेल्या या उद्याची आत्ताच का चिंता करायची..
--------------------------------------------------------------------
स्वप्नांच्या मागे अशी वेडय़ासारखी धावत सुटल्यावर कधी दमही लागतो. तेव्हा कधी तरी वाटतंही की कोणीतरी हात धरावा म्हणजे पुढचा डोंगर चढणं अधिक सोपं होईल.
पण असं आपल्यासोबत कोणी नाही ही जाणीव होते ना तेव्हा पुढची पावलं अधिक निर्धाराने पडतात आणि निर्धाराने पडलेलं प्रत्येक पाऊल अनोखा आनंद देऊन जातं..
--------------------------------------------------------------------
-omi
Monday, July 19, 2010
कधी कधी असं होतं...!
कधी कधी असं होतं...
भूतकाळ आठवतो..
मन वेडं-पिसं होतं..
कधी कधी असं होतं....!
आपलीच माणसं
आपलंच जग
क्षणात बदलतं..
कधी कधी असं होतं....!
खोल खड्ड्यात पडल्यासारखं वाटतं..
चारही बाजूंनी अंधार..
वरून येणारा प्रकाशाचा "एकच" कवडसा..
कसानुसा..
कधी कधी असं होतं....!
-omi
भूतकाळ आठवतो..
मन वेडं-पिसं होतं..
कधी कधी असं होतं....!
आपलीच माणसं
आपलंच जग
क्षणात बदलतं..
कधी कधी असं होतं....!
खोल खड्ड्यात पडल्यासारखं वाटतं..
चारही बाजूंनी अंधार..
वरून येणारा प्रकाशाचा "एकच" कवडसा..
कसानुसा..
कधी कधी असं होतं....!
-omi
Labels:
omkarkukade,
panorama,
कविता
Saturday, July 17, 2010
उरलेलं... नाव न सुचलेलं.. !
पण हे सारं अनुभवूनही अनेकदा मी फक्त वाचक असतो. केवळ वाचत राहतो. ते दु:ख, ती तळमळ शब्दांतून अनुभवतो, चार दिवस निर्जीव वावरतो आणि पाचव्या दिवशी माझं आयुष्य पुन्हा जगायला लागतो. अर्थात त्या फेजमध्ये फार दिवस वावरणं शक्यच होत नाही. ते माझं जगणं नसतं त्यामुळे मला माझं सोपं जगणं पुन्हा हवंसं वाटायला लागतं.
पुन्हा एखादं नवं बोचरं पुस्तक किंवा लेख वाचेपर्यंत हळूहळू ते बधिरत्व ओसरत जातं.
काही वेळा असं स्वत:चं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात केली ना की, काही काळ "guilty" फीलिंग येत राहतं. एखाद्या CCD, पिझ्झा हट किंवा तत्सम इटिंग आऊटलेटमध्ये "chillout" करण्यासाठी गेल्यावर तर फारच. कसलीशी जाणीव कुरतडत राहते. समोर आलेली, इतर वेळी शांत करणारी कोल्ड कॉफीही कसलीच मदत करत नाही. ते सारं चकचकीत, त्या झगागणाऱ्या दुनियेत सोडून तापणाऱ्या रस्त्यावर बाहेर यावंसं वाटतं. बोचणाऱ्या दगडधोंडय़ांमधून, रुतणाऱ्या काटय़ांमधून चालावसं वाटतं. रक्तबंबाळ व्हावंसं वाटतं.
पण असं हे इतकं भयावह, विचित्र वाटणं का?
हाही स्वार्थच असतो. स्वत:ला मिळालेला आनंद, सुख, समाधान याच्याबद्दल गिल्टी वाटू नये यासाठीची एक धडपड..
-------------------------------
खरं तर, या पुस्तकांतल्या पानांच्या तुलनेत खूपच सुखी, समाधानी आणि चांगलं आयुष्य वाटय़ाला आलंय.. तरीही स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, थोडा स्ट्रगल करायला लागतोय, कधीतरी काहीतरी निसटून गेलंय, काहीतरी हरवलंय म्हणून येता-जाता होणारी रडारड थांबत नाही. स्वत:त गुरफटून राहणं संपत नाही. विस्कटलेलं जगणं गोळा करता येत नाही. कधी या विस्कटलेपणाला आकार द्यावासा वाटलाच तर त्यासाठी इतरांनी मदत करण्याची अपेक्षा केली जाते. इतरांनी सारी कामं बाजूला ठेवून आपल्याकडे लक्ष द्यावंसं वाटतं. कधी असं नाही झालं तर पुन्हा एकदा कोष सज्ज असतोच गुंडाळून घेण्यासाठी..
कधी अशी मदत मिळतेही. पण अशी मदत घेऊनही न मिळालेल्या कसल्याशा गुलाबी आयुष्याशी होणारी तुलना थांबत नाही.
मग असं पुस्तक वाचल्यानंतर येणारं नैराश्य, ती पोकळी त्याचं काय?
वास्तव नेमकं कोणतं असतं? कोणाचं तरी दु:ख पाहून जगणं काही काळ विसरणारं की कोणाचं तरी छान दिसणारं आयुष्य पाहून उगाच हिरमुसून बसणारं? कळत नाही, स्वत:बद्दलच.
पुस्तकांमधून व्यक्त झालेल्या, माझ्यापर्यंत पोहोचलेल्या अशा तरंगांमधून प्रवास करताना कधीतरी जेव्हा स्वत:चा भरलेला पेला दिसतोही. पण तेव्हा हात फार सहज आभाळाला जाऊन टेकतात. कोणाला केलेली लहानशी मदतही मोठी भासायला लागते. त्यासाठी स्वत:चंच कौतुक वाटायला लागतं.
पिळवटणारं काही वाचताना, काही लिहिण्यासाठी कधी लेखणीला धार आणावीशी वाटली की स्वत:ची उंची आणखीनच वाढल्यासारखी वाटते. ते जगापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू होते. अर्थात मग दु:ख विकलं जातं. त्या पैसे देऊन पाहिलेल्या दु:खाचं जगाकडूनही कौतुक होतं. काचेच्या उंच भिंतींपलीकडे हे दुर्लक्षित विश्व पोहोचतं..
------------------------------------
पण त्यानंतर काय? या सगळ्याचा फायदा कोणाला होतो नेमका? त्या उपेक्षितांकडे नंतर किती वेळा मागे वळून पाहिलं जातं? त्यांची फक्त आठवणच उरते नि तेवढीच इतरांशी डोळ्यात पाणी आणून शेअर केली जाते. पण ही आठवण ज्यांनी रुजवलेली असते त्यांच्या आयुष्यात खरोखरच किती वेळा असं काही त्यांच्याविषयी लिहिल्याने, त्यांचं आयुष्य जगासमोर उलगडल्याने फरक पडतो? त्याच्या समस्या किती प्रमाणात खरोखर सोडवल्या जातात? त्यांचा संघर्ष कमी होतो का?
किंबहुना त्यांच्याबद्दल काही लिहिलं गेलंय ज्यामुळे त्यांना मदत होऊ शकते हे तरी त्या सगळ्यांना समजलेलं असतं का?
की केवळ आपलं समाधान असतं हे.. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो हे स्वत:ला आणि उर्वरित जगाला सिद्ध करण्याची धडपड असते ही..
या पुस्तकांचा, या लेखनाचा, भाबडय़ा संवेदनांना स्पर्श करणाऱ्या या दु:खाच्या प्रदर्शनाचा शेवट खरोखरच अपेक्षित आणि आनंदी होतो का?
जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात, जेव्हा हे वास्तव येऊन भिडतं तेव्हा आयुष्य काहीतरी टाइमपासमध्ये फुकट घालवतोय, अजून कन्स्ट्रक्टिव्ह काहीच काम झालं नाही आपल्या हातून, कित्ती काय काय करण्यासारखं आहे असा फील येतो. मग इतरांकडून कधी कौतुक ऐकत असताना आणि उंचच उंच आभाळात विहरत असताना, जे करतोय ते फार मोठं नव्हे अशी खाडकन् जमिनीवर फेकून देणारी जाणीव निर्माण होते. स्वत:च्या प्रेमात पाडणारी ती आत्ममग्नतेची धुंदी उतरते आणि बंद असणाऱ्या मनाच्या लहान लहान खिडक्या उघडायला लागतात.
अशा खिडक्या उघडल्या की सूर्यप्रकाश जरा रेंगाळायला लागतो. त्या प्रकाशात, पुस्तकांच्या पानांमधून बाहेर येऊन वास्तवातलं जगणं दिसायला लागतं.
मग रोजची धावपळ करतानाही समोरून येणाऱ्या आणि आजवर कधीच न दिसलेल्या एखाद्या अपंग माणसासाठी स्वत:हून वाट करून दिली जाते. घराच्या दाराशी येऊन कचरा उचलणाऱ्या बाईला थँक्स म्हटलं जातं. हॉटेलमध्ये सव्र्ह करणाऱ्या वेटरला माणूस म्हणून वागवलं जातं.
असं स्वत:तलंच खरं माणूसपण प्रत्यक्षात आजूबाजूला वावरायला लागतं..
---------------------------------------
प्रत्यक्ष पुस्तकात लिहिलेल्या, ते दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांपर्यंत दर वेळी नाही पोहोचता आलं तरी, कोणीतरी समाधानाने, कृतज्ञतेने, मिळालेल्या आदराने क्षणभर का होईना प्रसन्न जगू शकलं ना हे फीलिंग पण छान असतं. असे काही बदल खरं तर अगदी लहानसेच असतात. पण तरी माणूसपण थोडंसं जपणारे नक्की असतात.
मग पुढच्या रस्त्यावर जाणवतं की दु:ख व्यक्त करण्यासाठी वापरलेली पुस्तकांची कोरी करकरीत पानं, भलेमोठे लेख हे साध्य नसून केवळ साधन आहेत. मग भाबडय़ा जखमा भरतात. भरकटलेल्या संवेदना जागृत होतात आणि गोठलेपण संपवत या उपेक्षितांच्या आभासी हसणं ते वास्तवातलं हसू अशा प्रवासासाठी काय करता येईल याचा प्रगल्भ विचार करायला लागतात.
-omi
पुन्हा एखादं नवं बोचरं पुस्तक किंवा लेख वाचेपर्यंत हळूहळू ते बधिरत्व ओसरत जातं.
काही वेळा असं स्वत:चं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात केली ना की, काही काळ "guilty" फीलिंग येत राहतं. एखाद्या CCD, पिझ्झा हट किंवा तत्सम इटिंग आऊटलेटमध्ये "chillout" करण्यासाठी गेल्यावर तर फारच. कसलीशी जाणीव कुरतडत राहते. समोर आलेली, इतर वेळी शांत करणारी कोल्ड कॉफीही कसलीच मदत करत नाही. ते सारं चकचकीत, त्या झगागणाऱ्या दुनियेत सोडून तापणाऱ्या रस्त्यावर बाहेर यावंसं वाटतं. बोचणाऱ्या दगडधोंडय़ांमधून, रुतणाऱ्या काटय़ांमधून चालावसं वाटतं. रक्तबंबाळ व्हावंसं वाटतं.
पण असं हे इतकं भयावह, विचित्र वाटणं का?
हाही स्वार्थच असतो. स्वत:ला मिळालेला आनंद, सुख, समाधान याच्याबद्दल गिल्टी वाटू नये यासाठीची एक धडपड..
-------------------------------
खरं तर, या पुस्तकांतल्या पानांच्या तुलनेत खूपच सुखी, समाधानी आणि चांगलं आयुष्य वाटय़ाला आलंय.. तरीही स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, थोडा स्ट्रगल करायला लागतोय, कधीतरी काहीतरी निसटून गेलंय, काहीतरी हरवलंय म्हणून येता-जाता होणारी रडारड थांबत नाही. स्वत:त गुरफटून राहणं संपत नाही. विस्कटलेलं जगणं गोळा करता येत नाही. कधी या विस्कटलेपणाला आकार द्यावासा वाटलाच तर त्यासाठी इतरांनी मदत करण्याची अपेक्षा केली जाते. इतरांनी सारी कामं बाजूला ठेवून आपल्याकडे लक्ष द्यावंसं वाटतं. कधी असं नाही झालं तर पुन्हा एकदा कोष सज्ज असतोच गुंडाळून घेण्यासाठी..
कधी अशी मदत मिळतेही. पण अशी मदत घेऊनही न मिळालेल्या कसल्याशा गुलाबी आयुष्याशी होणारी तुलना थांबत नाही.
मग असं पुस्तक वाचल्यानंतर येणारं नैराश्य, ती पोकळी त्याचं काय?
वास्तव नेमकं कोणतं असतं? कोणाचं तरी दु:ख पाहून जगणं काही काळ विसरणारं की कोणाचं तरी छान दिसणारं आयुष्य पाहून उगाच हिरमुसून बसणारं? कळत नाही, स्वत:बद्दलच.
पुस्तकांमधून व्यक्त झालेल्या, माझ्यापर्यंत पोहोचलेल्या अशा तरंगांमधून प्रवास करताना कधीतरी जेव्हा स्वत:चा भरलेला पेला दिसतोही. पण तेव्हा हात फार सहज आभाळाला जाऊन टेकतात. कोणाला केलेली लहानशी मदतही मोठी भासायला लागते. त्यासाठी स्वत:चंच कौतुक वाटायला लागतं.
पिळवटणारं काही वाचताना, काही लिहिण्यासाठी कधी लेखणीला धार आणावीशी वाटली की स्वत:ची उंची आणखीनच वाढल्यासारखी वाटते. ते जगापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू होते. अर्थात मग दु:ख विकलं जातं. त्या पैसे देऊन पाहिलेल्या दु:खाचं जगाकडूनही कौतुक होतं. काचेच्या उंच भिंतींपलीकडे हे दुर्लक्षित विश्व पोहोचतं..
------------------------------------
पण त्यानंतर काय? या सगळ्याचा फायदा कोणाला होतो नेमका? त्या उपेक्षितांकडे नंतर किती वेळा मागे वळून पाहिलं जातं? त्यांची फक्त आठवणच उरते नि तेवढीच इतरांशी डोळ्यात पाणी आणून शेअर केली जाते. पण ही आठवण ज्यांनी रुजवलेली असते त्यांच्या आयुष्यात खरोखरच किती वेळा असं काही त्यांच्याविषयी लिहिल्याने, त्यांचं आयुष्य जगासमोर उलगडल्याने फरक पडतो? त्याच्या समस्या किती प्रमाणात खरोखर सोडवल्या जातात? त्यांचा संघर्ष कमी होतो का?
किंबहुना त्यांच्याबद्दल काही लिहिलं गेलंय ज्यामुळे त्यांना मदत होऊ शकते हे तरी त्या सगळ्यांना समजलेलं असतं का?
की केवळ आपलं समाधान असतं हे.. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो हे स्वत:ला आणि उर्वरित जगाला सिद्ध करण्याची धडपड असते ही..
या पुस्तकांचा, या लेखनाचा, भाबडय़ा संवेदनांना स्पर्श करणाऱ्या या दु:खाच्या प्रदर्शनाचा शेवट खरोखरच अपेक्षित आणि आनंदी होतो का?
जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात, जेव्हा हे वास्तव येऊन भिडतं तेव्हा आयुष्य काहीतरी टाइमपासमध्ये फुकट घालवतोय, अजून कन्स्ट्रक्टिव्ह काहीच काम झालं नाही आपल्या हातून, कित्ती काय काय करण्यासारखं आहे असा फील येतो. मग इतरांकडून कधी कौतुक ऐकत असताना आणि उंचच उंच आभाळात विहरत असताना, जे करतोय ते फार मोठं नव्हे अशी खाडकन् जमिनीवर फेकून देणारी जाणीव निर्माण होते. स्वत:च्या प्रेमात पाडणारी ती आत्ममग्नतेची धुंदी उतरते आणि बंद असणाऱ्या मनाच्या लहान लहान खिडक्या उघडायला लागतात.
अशा खिडक्या उघडल्या की सूर्यप्रकाश जरा रेंगाळायला लागतो. त्या प्रकाशात, पुस्तकांच्या पानांमधून बाहेर येऊन वास्तवातलं जगणं दिसायला लागतं.
मग रोजची धावपळ करतानाही समोरून येणाऱ्या आणि आजवर कधीच न दिसलेल्या एखाद्या अपंग माणसासाठी स्वत:हून वाट करून दिली जाते. घराच्या दाराशी येऊन कचरा उचलणाऱ्या बाईला थँक्स म्हटलं जातं. हॉटेलमध्ये सव्र्ह करणाऱ्या वेटरला माणूस म्हणून वागवलं जातं.
असं स्वत:तलंच खरं माणूसपण प्रत्यक्षात आजूबाजूला वावरायला लागतं..
---------------------------------------
प्रत्यक्ष पुस्तकात लिहिलेल्या, ते दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांपर्यंत दर वेळी नाही पोहोचता आलं तरी, कोणीतरी समाधानाने, कृतज्ञतेने, मिळालेल्या आदराने क्षणभर का होईना प्रसन्न जगू शकलं ना हे फीलिंग पण छान असतं. असे काही बदल खरं तर अगदी लहानसेच असतात. पण तरी माणूसपण थोडंसं जपणारे नक्की असतात.
मग पुढच्या रस्त्यावर जाणवतं की दु:ख व्यक्त करण्यासाठी वापरलेली पुस्तकांची कोरी करकरीत पानं, भलेमोठे लेख हे साध्य नसून केवळ साधन आहेत. मग भाबडय़ा जखमा भरतात. भरकटलेल्या संवेदना जागृत होतात आणि गोठलेपण संपवत या उपेक्षितांच्या आभासी हसणं ते वास्तवातलं हसू अशा प्रवासासाठी काय करता येईल याचा प्रगल्भ विचार करायला लागतात.
-omi
Labels:
confusion,
omkarkukade,
panorama
Friday, July 16, 2010
...! (खरंच काही नाव सुचलं नाही..)
सलग दोन-चार आठवडे जड विषयांवरची पुस्तकं वाचली. डोकं बधिरलं. ते लिहिलेलं बोचायला लागलं. स्वत:चं अस्तित्वही स्वत:ला टाळू पाहायला लागलं.
जड विषय म्हणजे नेमकं काय?
सांगता येत नाही..
गुडी गुडी जगण्याच्या पलीकडचं काही तरी.. मेंदूला मुंग्या आणणारं, एखाद्या गोष्टीचं सहजसाध्य solution आपल्या हातात नाही याची जाणीव करून देणारं, भीषण वास्तव म्हणता येईल असं काही..
असं पहिल्यांदाच वाचलं असंही नाही. कदाचित आता त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक "human" झाला असावा. म्हणून ते जास्त बोचलं असावं.
---------------------------------
ही पुस्तकातली माणसं कसं-कसं आयुष्य जगतात. कल्पनाच नाही करता येत किंबहुना कल्पना करणंही भयानक वाटतं. साधं दैनंदिन जीवन जगण्यासाठीही किती संघर्ष करावा लागतो कित्येकांना. मग स्वप्नं पूर्ण करणं तर दूरचीच गोष्ट.. पण तरीही हा संघर्ष जणू काही रोजचं सामान्य जगणं आहे, असा आभास घेऊन कितीतरी लोक जगतात, त्यातच कुठेतरी हसतात, आनंदात राहतात.
तरीही त्याचं जगणं मात्र घोटाळत असतं केवळ अत्याचार, गरिबी, अन्याय, सूड, लाचारी, हतबलता, अश्रू अशा शब्दांभोवतीच. त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये यश मिळेल आणि हे दुष्टचक्र भेदता येईल याची खात्री नसते.
पुस्तकामध्ये पानांमागून पानं असंच असतं. त्यातही महत्त्वाचं म्हणजे, हे सारं केवळ कल्पनेतलं जग नसतं की काही काळ त्याच्यामध्ये गुंतून, मग ते वाईट वाटणं आहे तिथेच ठेवून सहज पुढे निघून जाता येईल. हे इतकं अंगावर येणारं वास्तव असतं की ते वाचून एखाद्या क्षणी मनही "react" करायला विसरून जातं..
स्तब्धता, पोकळी, अंधार फक्त..
-----------------------------------
थोडा अर्धवट वाटतोय ना?? मी पण असाच अर्धवट फील करतोय.. स्वतःला..
पण लवकरच याचा उरलेला अर्धा भाग घेऊन येईन...
सध्या हाच अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामा ग्लास घ्या!
-omi
जड विषय म्हणजे नेमकं काय?
सांगता येत नाही..
गुडी गुडी जगण्याच्या पलीकडचं काही तरी.. मेंदूला मुंग्या आणणारं, एखाद्या गोष्टीचं सहजसाध्य solution आपल्या हातात नाही याची जाणीव करून देणारं, भीषण वास्तव म्हणता येईल असं काही..
असं पहिल्यांदाच वाचलं असंही नाही. कदाचित आता त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक "human" झाला असावा. म्हणून ते जास्त बोचलं असावं.
---------------------------------
ही पुस्तकातली माणसं कसं-कसं आयुष्य जगतात. कल्पनाच नाही करता येत किंबहुना कल्पना करणंही भयानक वाटतं. साधं दैनंदिन जीवन जगण्यासाठीही किती संघर्ष करावा लागतो कित्येकांना. मग स्वप्नं पूर्ण करणं तर दूरचीच गोष्ट.. पण तरीही हा संघर्ष जणू काही रोजचं सामान्य जगणं आहे, असा आभास घेऊन कितीतरी लोक जगतात, त्यातच कुठेतरी हसतात, आनंदात राहतात.
तरीही त्याचं जगणं मात्र घोटाळत असतं केवळ अत्याचार, गरिबी, अन्याय, सूड, लाचारी, हतबलता, अश्रू अशा शब्दांभोवतीच. त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये यश मिळेल आणि हे दुष्टचक्र भेदता येईल याची खात्री नसते.
पुस्तकामध्ये पानांमागून पानं असंच असतं. त्यातही महत्त्वाचं म्हणजे, हे सारं केवळ कल्पनेतलं जग नसतं की काही काळ त्याच्यामध्ये गुंतून, मग ते वाईट वाटणं आहे तिथेच ठेवून सहज पुढे निघून जाता येईल. हे इतकं अंगावर येणारं वास्तव असतं की ते वाचून एखाद्या क्षणी मनही "react" करायला विसरून जातं..
स्तब्धता, पोकळी, अंधार फक्त..
-----------------------------------
थोडा अर्धवट वाटतोय ना?? मी पण असाच अर्धवट फील करतोय.. स्वतःला..
पण लवकरच याचा उरलेला अर्धा भाग घेऊन येईन...
सध्या हाच अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामा ग्लास घ्या!
-omi
Labels:
confusion,
omkarkukade,
panorama
Wednesday, July 14, 2010
Hello world...!
"Hello World..!" this is one of the first ever sentences we write in our first program.. whether it may be C, C++, C#, JAVA!
I am writing it here, on my blog because this is the first time ever i am trying to blog in English! :)
Being a Marathi medium school guy; I was never confident about my English!( anyhow... Marathi medium schools rock! I loved my schooling & I am proud to be a student of Nu Ma Vi.. ) I was confident about my grammar though.. but still can't use "English" as my thinking language... I am trying hard.. hope I will succeed soon! :)
Many people told me that I am not that bad in English.. & I can write.. but I myself was not that confident!
but today.. some person.. a teacher.. motivated me to write in "English".. due to her framing of sentences and vocabulary.. I have started considering that I am not bad at all..
so.. firstly, i will thank that teacher..
Ma'am, i got the confidence to write something in English by attending your lecture..
now seriously..
as the name of my blog is "Panorama".. i always thought of "widening" my views.. be more global.. always wished to share thoughts in a global language.. this is just a start.. hope I will write more!
this is one nice thing i got.. and would like to share with you all!
THE LANGUAGE I LOVE
Oh how sweet and melodious
Is the language of mute creatures
More soothing to my soul
Than the rude language of people
How tranquilly, how tenderly
The trees talk to me
The gurgling at the water's edge
The heath on the mountains
The broom of the warrens
Waving in the wind
The golden sea of the moors
That tell me legends
That sing me verses
Arthur. Isolde. Merlin.
March 1968.
vote of thanks..
all my friends who motivated me to write in English..
Sumedh Sidhaye and his "Confessions of Confused Mind"
Sumedh.. your blogs gave me idea for this blog!
thanks a lot! :)
-omi
I am writing it here, on my blog because this is the first time ever i am trying to blog in English! :)
Being a Marathi medium school guy; I was never confident about my English!( anyhow... Marathi medium schools rock! I loved my schooling & I am proud to be a student of Nu Ma Vi.. ) I was confident about my grammar though.. but still can't use "English" as my thinking language... I am trying hard.. hope I will succeed soon! :)
Many people told me that I am not that bad in English.. & I can write.. but I myself was not that confident!
but today.. some person.. a teacher.. motivated me to write in "English".. due to her framing of sentences and vocabulary.. I have started considering that I am not bad at all..
so.. firstly, i will thank that teacher..
Ma'am, i got the confidence to write something in English by attending your lecture..
now seriously..
as the name of my blog is "Panorama".. i always thought of "widening" my views.. be more global.. always wished to share thoughts in a global language.. this is just a start.. hope I will write more!
this is one nice thing i got.. and would like to share with you all!
THE LANGUAGE I LOVE
Oh how sweet and melodious
Is the language of mute creatures
More soothing to my soul
Than the rude language of people
How tranquilly, how tenderly
The trees talk to me
The gurgling at the water's edge
The heath on the mountains
The broom of the warrens
Waving in the wind
The golden sea of the moors
That tell me legends
That sing me verses
Arthur. Isolde. Merlin.
March 1968.
vote of thanks..
all my friends who motivated me to write in English..
Sumedh Sidhaye and his "Confessions of Confused Mind"
Sumedh.. your blogs gave me idea for this blog!
thanks a lot! :)
-omi
Labels:
english,
omkarkukade,
panorama
Monday, July 12, 2010
मित्र.. हक्काचे.. "माझे"...
मला माझे मित्र खूप जवळचे वाटतात!
वाटतात ; कारण ते खरंच जवळचे असतात!
मित्र भेटत गेले.. मैत्री वाढत गेली..
एकमेकांच्या मनामधली अंतरं आपोआपच कमी होत गेली...
शाळा कॉलेज मधल्या मित्रांची मला आठवण येतच नाही...
आठवण येत नाही.. कारण मी त्यांना कधी विसरूच शकत नाही..
आयुष्यात येणारी वादळं काय कमी असतात??
पण या वादळांमध्ये हक्काचा आसरा देणारी या मित्रांचीच मनं असतात!
आसऱ्यासाठी दारावर दस्तक द्यायची पण गरज नसते..
माझ्या मित्रांच्या मनांची दारंच काय..
अहो, खिडकीही माझ्यासाठी कायम उघडी असते...
-omi
वाटतात ; कारण ते खरंच जवळचे असतात!
मित्र भेटत गेले.. मैत्री वाढत गेली..
एकमेकांच्या मनामधली अंतरं आपोआपच कमी होत गेली...
शाळा कॉलेज मधल्या मित्रांची मला आठवण येतच नाही...
आठवण येत नाही.. कारण मी त्यांना कधी विसरूच शकत नाही..
आयुष्यात येणारी वादळं काय कमी असतात??
पण या वादळांमध्ये हक्काचा आसरा देणारी या मित्रांचीच मनं असतात!
आसऱ्यासाठी दारावर दस्तक द्यायची पण गरज नसते..
माझ्या मित्रांच्या मनांची दारंच काय..
अहो, खिडकीही माझ्यासाठी कायम उघडी असते...
-omi
Labels:
omkarkukade,
panorama,
मैत्री
Sunday, July 11, 2010
Analogy..!
पाऊस "ये" म्हणून येत नाही...
"थांब" म्हणून थांबत नाही...
प्रेम... असंच असतं...
नाती मैत्री.. या पुसट रेघा असतात..
त्या ठळक करणं... घट्ट करणं....
यालाच तर जीवन म्हणतात..
लाजल्यावर स्त्री.. आणि विजेच्या लखलखाटानी
आकाश उठून दिसतं..
ते अनुभवणं.. यालाच तर खरं भाग्य म्हणतात...
-omi
"थांब" म्हणून थांबत नाही...
प्रेम... असंच असतं...
नाती मैत्री.. या पुसट रेघा असतात..
त्या ठळक करणं... घट्ट करणं....
यालाच तर जीवन म्हणतात..
लाजल्यावर स्त्री.. आणि विजेच्या लखलखाटानी
आकाश उठून दिसतं..
ते अनुभवणं.. यालाच तर खरं भाग्य म्हणतात...
-omi
Labels:
omkarkukade,
panorama,
कविता
Subscribe to:
Posts (Atom)