Tuesday, August 17, 2010

confused...

कोणतं तरी कॉलेज दोन अडीच महिने मेहनत घेऊन एखादं नाटक बसवतं.. त्यांना जाणदेखील नसते याचे परिणाम काय होतील... एखाद्या गाजलेल्या स्पर्धेत ते त्यांचं नाटक उतरवतात.. सुरेख अभिनय करून दाखवतात.. पण समोर बसलेल्या प्रेक्षकांपैकी काही जणांच्या भावना दुखावतात.. भारत हा एक "democratic" देश आहे. इथे प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे.. म्हणून ते त्या प्रयोगातून "walkout" करतात.. पण तेव्हा ते हे विसरतात.. की समोर जे कॉलेज नाटक दाखवतंय ते कॉलेज आणि त्यांचे विद्यार्थी याच "democratic" भारताचे नागरीक आहेत.. त्यांना पण विचार स्वातंत्र्य आहे.. मान्य.. की त्या मुलांनी जे दाखवलं ते चुकलं.. नक्कीच चुकलं.. आपली तशी संस्कृती नाही... पण एखाद्या टंच आणि "हॉट" अभिनेत्रीचा bed scene यांना बघायला आवडतो.. रांगा लावून १५० रुपयांचं ticket काढून बघताच ना ते? मग या महाविद्यालयांनी जर ते नाटकात दाखवलं तर कुठे चुकलं?? असा ही एक सूर ऐकू येतो.. रंगमंदिराच्या बाहेर त्या महाविद्यालयाची प्रातिनिधिक पोस्टर्स जाळली जातात.. आम्ही आज ते घरी जातात कसे तेच बघतो.. अशा धमक्या ऐकू येतात... ही धमकी देणारी मुलं आणि त्यांचे समर्थक "आमचे संस्कृती हनन" केले म्हणून चिडलेली असतात.. पण जेव्हा एखादा या भडकलेल्या मुलांमधलाच दारू पिऊन गणपती मिरवणुकीसमोर धिंगाणा घालतो.. अश्लील हातवारे करतो.. तेव्हा ही so called "MORAL POLICE" कुठे असते?

-omi

No comments:

Post a Comment