Friday, November 12, 2010

Maturity...!

What is maturity after all? We hear people call someone mature/childish pretty often. So who defines what maturity is?
I think it is:
01.controlling (not supressing) your emotions
02.being able to prioritize things in life
03.knowing when to shut up and leave
04.knowing what are you doing and where you are going (most of the times)
04.ability to forgive
05.taking pleasure in giving sometimes rather than recieving all the time
06.ability to take a decision and stand by it
07.accepting failures and bouncing back
08.willingness to change something you don't like and to accept something you can't change
08.willingness to change your thoughts and not your basics (I donno whether to call them ethics or morals or principles or watever)

What do u think?


-omi

Thursday, November 11, 2010

change!

that was interesting!!!
really!
someone loves for what you are, appreciates the way you live your life and when your with that person, when the love blossoms, he/she expects you to change!!
but seriously, i'm confused, this is strange, people change themselves everyday, every moment, for someone else or something else because you want that someone or something, and when you change, you also change what you like and wat u want!!
and... again the cycle goes on.....
this is called as 'adjustment' or 'compromise'...
life is full of ironies....


-omi

Tuesday, November 9, 2010

GYPSY.. possibly a correct word for me! :)

Sometimes i feel that im a crazy concoction of multiple personalities....
i have extremely contrast views abt anything..depending on the state of mind....
i love to dream abt future but i also indulge in my past very often....
i donno which side weighs heavier.....
love to be socially active, meet ppl, also like loneliness...donno which is predominant.....
love to be alone with the nature, on the other hand love the fast life in the cities...
again who knows which is more interesting!!!
.
.
life is full of so many choices..i fear i have only one life of limited time and im trying to experience everything in just one life...rather i want to!!
I am like a Gypsy in this endless world...
i'll go wherever it will take me....then do i expect stability??? wat is it anyways?? i dont believe anything is stable...if it looks like, its just the state of 'dynamic equilibrium', things changing on both sides makes u feel like stability...


-omi

Monday, November 8, 2010

its my idea of love.. :)

He wanted to hear her speech at that big conference.
.
.
.
But he was too ill to take the trip.
.
.
.
He didn't let her kiss him cos of the bad viral fever.
.
.
.
As she left, he blew a kiss at her and she threw a pillow back at him.
.
.
.
.
.
his cell phone beeped..
.
.
<1 New Message>
.
.
.
'Muaaaaah. Now, sleep.'


-omi

Saturday, November 6, 2010

कधी कधी...

कधी कधी... रुक्षपणाच बरा वाटतो!
कधी कधी... एखादा अंधारा कोपराच छान आपलासा वाटतो!
कधी कधी... रडायचं नसलं तरी डोळ्यातून अश्रू ओघळतात!
कधी कधी... काळजीपोटी आलेले शब्द सुद्धा सुयांसारखे बोचतात!
कधी कधी... स्वप्न भविष्यात मानगुटीवर भुतासारखी बसतात!
कधी कधी... सगळंच सोडून द्यावसं वाटतं!
कधी कधी... आयुष्यात यशापेक्षा खाचखळगेच जास्त आहेत असं वाटतं!
कधी कधी... कितीही काळजी घेतली तरीही पडावंच लागतं!
कधी कधी... आपण जसे आहोत तसे राहणं खूप तोट्याचं असतं!
कधी कधी... खूप खूप एकाकी रहावसं वाटतं!
कधी कधी...


-omi

Thursday, November 4, 2010

...! ? !...

Warning: This post may have little or no sense in it.

'What a way to nap!!!' - would have been the thought for those who happened to glance at me in the last few minutes. Being seated in a meditating posture with an empty notepad opened up would make anyone think so. ( as my earlier DP was :D )

I have been under alternating spells of indulgence and ignorance when it comes to my blog. My reduced online presence didnt help much to alleviate the cause. However, most of my chats/replies/statuses were filled with questions about this place.

And so, here am with an open notepad, trying to pen something other than a my so called Philosophies.
As it turns out, I feel that I have become a little rusty with respect to my writing-thought process. There are plenty of topics to write about, from the Obama Visit to the last Indian whitewash (blue wash) to OZs, from the disappointing quality of recent Marathi TV daily soaps to return of the famous TV series like KBC.

But then I realised that I had been staring at the empty notepad for so long with loads of passersby.
You know what they say, 'being busy' is better than 'pretending to be busy'; try it, its tough.
Since staring at the monitor is not considered to be a part of the 'busy' process, I start to type into the notepad.

Within seconds, the surrounding world fades away but for my Facebook which keeps giving notification pings all the time. And there came the shock when I looked at the trending topic - IS SEHWAG BETTER THAN SACHIN? ( Courtsey : India TV or something like that only! )

Shrugging off the diversion, I focus back into typing clear words. Minutes pass by, few paragraphs get written and I stop to review them. Gosh, I begin to realize that this is just another one of those endless 'offbeat-style' rambles... (BEEP)


-omi

Monday, November 1, 2010

झगडणं..

ती दुपार फारच हळू उलगडत होती..
तो ती वेळ कशी जाईल याची वाट पाहत होता..
झगडत होता..
त्या कंटाळवाण्या वेळेशी..
संध्याकाळी "तिला" कुठं भेटायचं? ते यंदा सुट्टी घेऊन कुठे फिरायला जायचं..
हे सगळे विचार सर्रकन त्याच्या मनात येऊन गेले..
तरीही..
तो झगडतच राहिला..
त्या कंटाळवाण्या वेळेशी..
शेवटी तो दमला..
सोडून दिलं त्यानी..
लढणं..
आणि मग..
त्याला शांत झोप लागली!

;)

-omi

Saturday, October 30, 2010

एक होता राजा..

एक होता राजा.
एका प्रगत राज्याचा.
किमान ५०% प्रजेला तरी आवडला होता तो.
तसा कौलच दिला होता प्रजेनी!
सगळं सुखात चालू होतं..
आधीच्या राजापेक्षा हा राजा कित्ती कित्ती छान होता माहितेय?
त्याचे खेळाडू बऱ्याच स्पर्धांमध्ये जिंकत होते.
उद्योग भरभराटीला आले होते
सगळं कसं आल-बेल होतं..
सर्व प्रजेवर त्याचा देता "हात" होता!
पण हाच हात नकळत पाठीत धपाटा घालू शकतो हे कोणालाच वाटलं नाही..
आणि फक्त धपाटा नाही.. पाठीत खंजीरही खुपसला गेला.
बेसावध प्रजा.. आणि चतुर राजा..
चतुर? की धूर्त?
परवा परवाच खेळाडूंच्या सत्कारात आनंदात असलेला राजा इतका बदलू शकतो असं वाटलंच नाही!

सन २०००:
स्थळ : कारगील मधल्या एका वीराचं घर.


एवढी माणसं त्याच्या घरात कधीच जमा झाली नव्हती. घरात एवढी माणसं असूनही तिथे खूप शांतता होती. ही सारी माणसं त्याच्या बाबासारखीच होती. युनिफॉर्ममधली माणसं.. त्यांनी कसलीशी मोठ्ठी पेटी घरात आणून ठेवली. त्यांनी त्या पेटीचं झाकण उघडलं नि त्यामध्ये त्याला दिसला त्याच्या बाबाने ज्या झेंडय़ाला कायम सॅल्युट करायला शिकवलं तो तिरंगा. सवयीने त्याने सॅल्युट केला आणि त्याच्या आईने त्याला घट्ट जवळ घेतलं. तो घुसमटला पण आईने त्याला सोडलं नाही. त्याच्या बाबाचा चेहरा दिसता-दिसता मध्येच आईने जवळ घेतल्याने हरवून गेला.. आईने असं का केलं ते त्याला कळलंच नाही.
त्या वेळी तो होता अवघ्या साडे तीन वर्षांचा. त्याला आजूबाजूला नेमकं काय घडतंय काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त कळत होतं आजूबाजूच्या काही लोकांचं रडणं, काहींचं तटस्थ असणं नि त्याच्या आईचं काहीसं विचित्र शांत असणं. त्याला वेगळंच काही उमगत होतं. आई काही तरी वेगळी वागतेय, आजी-आजोबा सतत रडतायत, घरी खूप पाहुणे आले आहेत, पण एकानेही आपल्यासाठी चॉकलेट आणलेलं नाही, कुणीच हसत नाही, आपल्याला लाडाने उचलून घेत नाही असं बरंच काही, अर्धवट त्याला जाणवत होतं. मग कोणी तरी म्हणालं की, त्याचा बाबा गेला. पण तो कुठे गेला, तो कधी आला होता, मग न भेटता कसा गेला हेच त्याला कळत नव्हतं. आईलाही विचारता येत नव्हतं..

सन २०१०:
स्थळ : त्याच कारगील मधल्या त्याच वीराचं घर.


तो मुलगा आता १२ वर्षांचा झालाय.
आता आपण नवीन घरात राहायला जाणार म्हणून तो खूष आहे!
नवीन मित्र.. नवीन घर.. नवीन रिक्षावाले काका..
आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं हे त्याला थोडाफार कळतं.
शाळेमध्ये त्याला खूप आदरानी वागवतात.
त्याच्या आईकडून तो त्याच्या वडिलांच्या शौर्यकथा ऐकतो.
आपल्या वीर वडिलांबद्दल त्याला खूप अभिमान आहे.
त्याला सुद्धा सैन्यात जायचंय!
मग त्या दिवशी तो पेपर मध्ये वाचतो!
त्याला काहीच कळत नाही.
तो आईला विचारतो..
आई म्हणते "बेटा, तुला हे घर आवडतं?"
तो होकारार्थी मान डोलावतो.
आई म्हणते, "मग आपण कशाला नवीन घरात जायचं? इथेच राहू! बाबा पण आहेत ना इथे?"
त्याच्या बालमनात असंख्य प्रश्न उद्भवतात..
तो हो म्हणतो..
सवयीप्रमाणे!
२ दिवस नुसता गप्प गप्प असतो तो!
राजा आपल्याशी असं का वागला असं तो आईला विचारतो.
आई म्हणते.. "तो राजा आहे.. तो म्हणेल ते योग्य."


आपण हे सगळं पेपर मध्ये वाचतो..
आपलं रक्त खवळत असतं..
शेगडीवरच्या उकळणाऱ्या चहासारखं!
"अगं.. हे वाचलंस का?
ही "वहाण" आता फेकूनच द्यायला हवी..
फारच बोचायला लागलीय..
मागच्या पेक्षा बरी म्हणून ही आणली.. वाटलं होतं २०१४ पर्यंत टिकेल..
पण हल्लीच्या गोष्टींना ना एक्सपायरी डेट असूनही काही फरक पडत नाही!"
गरम गरम चहा समोर येतो..
मारीचं बिस्कीट नाही का? असं विचारतो. तेही मिळतं!
आपल्याला काय?
त्या सैनिकांच्या नातलगांना घर नाही मिळालं म्हणून मी बोंबाबोंब करून काय उपयोग?
माझं ऐकणार आहे का राजा?

तसंही प्रजेचं कधी ऐकलं म्हणा त्यानी.....

आणि आपला चहा होतो.. अंघोळ आणि पूजा उरकून आपण आपल्या ऑफिस ला पोचतो.
साला तिथे पण हाच विषय.
लंच मध्ये २-४ वाक्यांची "सपट ऑफिस महाचर्चा" रंगते!
आणि नंतर.. दिवाळीचा बोनस कधी येणार हे कळेल का? या वाक्यावर थांबते!
मग राजा ऐवजी बॉस ला थोड्या प्रेमाच्या शिव्या!
दिवस संपतो!

तो १२ वर्षांचा मुलगा मात्र धुमसत असतो..
माझा बाप काही ऐरा गैरा वाटला की काय या राजाला.

तो ठरवतो!
मी पण माझ्या बापासारखाच होणार..
शूर..
आणि आईला नवीन घरात घेऊन जाणार..

ही असते आग...
वाघाचा बछडा सुद्धा वाघच असतो..
आणि तो छातीवरच्या मेडलसाठी नाही.. तर एक सच्चा देशभक्त म्हणून सीमेवर जातो..
आपले देशबांधव सुखात झोपावेत म्हणून!
हा असतो आदर्श..

राजाला त्याची किंमत कदाचित कधीच कळणार नाही..
कितीही वाघांनी कितीही जोरात डरकाळ्या फोडल्या तरी..


-omi

छोट्या पिल्लाची पहिली कविता!

सूर्या, मित्रा तुला एक सांगू का?
राग तर तुला येणार नाही ना?
रविवारी लवकर उठायची गरजच काय?
आमचे असतात ना अंथरुणात पाय!
तुझ्या आगमनाने उठतात माता पिता,
घालतात आम्हाला जोरात लाथा !
प्रसाद मिळाल्यावर मग उठावेच लागते ,
पहाटेच अभ्यासाला मग बसावेच लागते!
मध्येच डुलकी येते छोटी,
थोबाडीत चापटी मिळते मोठी!
खडबडून मग उठावेच लागते,
खरोखरीच पुस्तक वाचावेच लागते!
हाल करायला टपूनच असतोस,
का रे आम्हाला त्रास तू देतोस?
त्यापेक्षा रविवारी जास्त झोपत जा,
नऊ-दहा ला उगवत जा!! :)



निर्मिती - चारुता तेंडूलकर .... :)

Thursday, October 28, 2010

भीती..

भीती..
माणसाला आयुष्यात जाणवलेली ही पहिली भावना..
आईच्या पोटात असताना आपण सुखरूप असतो! सेफ असतो! एखादं बाळ जन्मल्यानंतर का रडतं? याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर असं कळलं की त्या सेफ वातावरणातून बाहेर येऊन त्रासात जगायची त्याला भीती वाटत असेल.. स्वत:च्या पायावर उभं राहण्याची, स्वत: सगळं करण्याची भीती.. एक अनामिक भीती..
तेच बाळ जेव्हा २-३ दिवसांचं होतं.. आणि लोकं त्याला बघायला म्हणून येतात.. तेव्हा त्याला स्वतःच्या हातात घेतात.. खेळवतात.. तेव्हा त्या बाळाच्या चेहेऱ्यावर तीच भीती बघायला मिळते! हा जो प्राणी आहे.. जो मला खेळवतोय.. तो मला पाडणार तर नाही ना मला इजा तर होणार नाही ना ही भीती..
माणसाचं आयुष्य असंख्य भीतींनी वेढलेलं आहे..
तसाच जगत असतो माणूस!
ते बाळ अजून मोठं होतं. शाळेत जाऊ लागतं. परीक्षा देऊ लागतं ( आता ८ वी च्या पुढे नाही का परीक्षा!.. श्या.. " आमच्यावेळी असं नव्हतं! पूर्वीसारखी मजा राहिली नाही" : सौजन्य : पु.ल.देशपांडे ) तर.. त्या परीक्षेत कधीतरी कमी मार्क्स पडतात.. ( आम्हाला नेहेमी कमीच पडायचे. :( ) मग कमी मार्क पडले की त्या विषयाची भीती बसते! त्या विषयाच्या पुस्तकाला सुद्धा हात लावावासा वाटत नाही. मग ओब्विअसली त्याचा अभ्यास होत नाही. मग परत मार्क कमी पडतात.. मार्क लिस्ट घरी दाखवायची कशी? हे सगळं दुष्टचक्र सुरु होतं.. ( मला एक अयशस्वी आयडिया सुचली होती.. शाळेत असताना.. मी सांगायचो रिझल्ट लागलाच नाही. नंतर लागेल! पण माझे काही फितूर मित्र होते. ते आगाऊपणा करून घरी फोन करायचे. आणि आई-बाबांपैकी कोणी फोन उचलला.. की मला मार पडणं ठरलेलं असायचं! मग दुसऱ्या दिवशी शाळेत त्या आगाऊ "हितचिंतक" मित्राची धुलाई.. त्याला जर कल्पना आली असेल की हा भडकलाय.. आणि आपली काही खैर नाही.. तर त्याच्याही मनात "भीती"! )
हेच आपलं "बाळ" अजून थोडं मोठं झालं की प्रेमात वगैरे पडतं. मग त्याची "ती" त्याला नाही म्हणली तर? याची भीती..
हो म्हणली तर घरी सांगितल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल.. याची भीती.. त्यांना आवडलं नाही तर? याची भीती..

भीती भीती भीती..
तिला स्पेसिफिक असं रूप नाही. अमूर्त आहे! सगळीकडे आहे!
इंजेक्शनची भीती..
मुलींना केस गळण्याची भीती..
वेगाची भीती..
मृत्यूची भीती..
एखाद्या विशिष्ट प्राण्याची भीती..( मोस्टली "कीटक" )
काहींना उंचीची भीती वाटते!
काहींना अंधारात जायला घाबरायला होतं..
काही पाण्याला भितात..
माझ्या ओळखीचे काही लोक आहेत की जे लिफ्ट मधून जायला घाबरतात. कोंडल्यासारखं वाटतं त्यांना. धाप लागली तरी चालते. पण ते २० मजले पण चढून जातील..
ही काही उदाहरणं आहेत असं म्हणलात तरी चालेल..
ही उदाहरणं सोडून सुद्धा अनेक प्रकारात भीती समोर येते!

आता लिहितोच आहे तर एक केस आठवली..
एक प्रख्यात सायकियाट्रिस्ट आहेत. पुण्यातच असतात. त्यांच्याकडे एक पेशंट आला होता. त्या बिचाऱ्या पेशंटला भीती वाटत होती की कोणीतरी त्यांच्या अंगावर गरम पाण्यात ओला केलेला पंचा टाकणार आहे.. आणि त्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू होणार आहे.
डॉक्टरांनी केस व्यवस्थित समजावून घेतली. त्यांना स्ट्रेस बस्टर गोळ्या दिल्या आणि २ दिवसांनी पुढच्या सिटींगला बोलावलं. २ दिवसांनी डॉक्टर उपाय घेऊन तयार होते पण तरीही त्यांनी त्या पेशंटला पुन्हा असं वाटलं का असं विचारलं. होकारार्थी उत्तर आल्यावर त्यांनी उपाय सांगितला. ते म्हणाले पुन्हा जर तुम्हाला असं वाटलं तर तो जो कोणी आहे.. त्याला ओला पंचा टाकू दे.. तुम्ही तुमच्या हातानी तो बाजूला करून टाका..

तुम्हाला खरं नाही वाटणार.. पण तो पेशंट २ दिवसात खडखडीत बरा झाला.
खरं सांगायचं झालं, तर भीती हा एक मनाचा खेळ आहे.. आणि थ्रील हवं म्हणून सुद्धा लोकं आपणहून भीती वाटेल असं काहीतरी बघतात. हॉरर सिनेमे बघण्यामागे हेच कारण असतं!
प्रत्येकाला कसली ना कसली तरी भीती वाटतच असते!
मला सुद्धा भीती वाटते.. माझे जवळचे लोकं मला सोडून गेले तर माझं कसं होणार असं वाटतं.

माझ्या मते.. काहीही झालं तरी आपल्या रोजच्या दिनचर्येवर या भीतीचा परिणाम होता कामा नये!
हार्ट बीट वाढवून घ्यायची.. ते थ्रील एन्जॉय करायचं!
घाबरायचं.. पण.. एका प्रमाणात..!

क्योंकी डर के आगे जीत है!


finally...
the vote of thanks!
Mr.Amit Karve.. for giving me an excellent topic to write on!
i really enjoyed Amit! ( मला कर्व्या असं म्हणायचंय )


-omi